---Advertisement---

क्रिकेटविश्वातून दु:खद बातमी! मुंबईच्या माजी खेळाडूने वयाच्या ४०व्या वर्षीच घेतला अखेरचा श्वास

---Advertisement---

क्रिकेट विश्वातून दु:खद बातमी समोर येत आहे. मुंबईचा माजी वेगवान गोलंदाज राजेश वर्माचे रविवारी (दि. २४ एप्रिल) निधन झाले. त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने प्राणज्योत मालवली. तो ४० वर्षांचा होता. राजेश २००६-०७मधील रणजी ट्रॉफीच्या विजयी संघाचा भाग होता. ही माहिती राजेशचा मुंबई संघातील माजी सहकारी भाविन ठक्कर याने दिली. राजेशच्या निधनाने क्रीडाविश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (Rajesh Verma Died Due To Heart Attack)

राजेशची कारकीर्द
राजेश वर्माच्या (Rajesh Verma) कारकीर्दीवर नजर टाकली, तर त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये फक्त ७ प्रथम श्रेणी सामने खेळले होते. यामध्ये तो २००६ ते ०७मध्ये रणजी ट्रॉफी विजेत्या मुंबई संघाचा भाग होता. राजेशने २००२-०३ हंगामात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तसेच, तो आपला शेवटचा प्रथम श्रेणी सामना २००८ साली पंजाबविरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---