---Advertisement---

PBKS vs Mi: मुंबई इंडियन्सची टॉप- 2 मध्ये पोहोचण्याची संधी हुकली, मुंबईच्या पराभवानंतर काय म्हणाला हार्दिक?

---Advertisement---

आयपीएल 2025 (IPL 2025) स्पर्धेमध्ये 69 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स (mumbai indians vs punjab kings) संघात खेळण्यात आला. या सामन्यात मुंबई इंडियन्सला अखेरच्या लीग सामन्यात पंजाब विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सचा 7 विकेट्स आणि 9 धावांनी पराभव केला. या पराभवासह मुंबई संघ आता पॉईंट्स टेबलमध्ये (points table) चौथ्या स्थानीच राहणार आहे. त्यामुळे मुंबईने आता टॉप-2 मध्ये जाण्याची संधी गमावली आहे. मुंबईने स्पर्धेची सुरुवात पराभवासह जशी केली होती, आता शेवट देखील पराभवाने केला आहे.

मुंबई इंडियन्सने 14 सामन्यांत 8 विजय आणि 6 पराभवांसह 16 गुण मिळवले आहेत, परंतु त्यांचे लीग सामने संपले आहेत. त्यामुळे मुंबई आता टॉप-2 मध्ये पोहोचू शकत नाही. याचा अर्थ असा आहे की, मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये एलिमिनेटर सामना खेळावा लागेल आणि जेतेपद जिंकण्यासाठी सलग 3 सामने जिंकावे लागतील.

मुंबई इंडियन्सने पंजाबविरूद्ध सामन्यात खूप चुका केल्या, ज्याचा संघावर परिणाम झाला. मुंबईच्या फलंदाजांनी देखील खूप निराशाजनक कामगिरी केली. कर्णधार हार्दिकने (Hardik pandya) सामन्यानंतर वक्तव्य केले आहे. हार्दिक म्हणाला, ज्याप्रकारची खेळपट्टी होती, ते पाहता आम्ही नक्कीच 20 धावा कमी केल्या होत्या. पण असं कधी-कधी होतं. आम्ही चांगलं क्रिकेट खेळत आलो आहे. पण आज आम्ही चांगलं खेळलो नाही, ज्याचा आम्हाला फटका बसला. आयपीएलमध्ये असं पाहायला मिळत. या संघाने 5 ट्रॉफी जिंकल्या आहेत, त्यामुळे हे नेहमीच अवघड असत.

पुढे बोलताना हार्दिक म्हणाला, तुम्ही थोडं कुठे कमी पडलात की, बाकीचे संघ पुढे होत सामने जिंकण्यासाठी तयार असतात. सर्वांसाठी साध सरळ सांगणं असेल. ही एक चूक झाली, यातून शिकूया आणि प्लेऑफसाठी सज्ज होऊया. आमच्याकडून ज्या चुका झाल्या त्या नंतर शोधू, पण एक फलंदाजी युनिट म्हणून आम्ही 20 धावा जास्त करण्यात मागे पडलो.

इम्पॅक्ट प्लेअर (impact player) म्हणून कर्ण शर्मा (karn Sharma) एक चांगला पर्याय असू शकला असता असं देखील हार्दिक म्हणाला, आम्ही अश्वनीबरोबर (ashvani kumar) उतरण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण हंगामात हीच रणनिती होती. या खेळपट्टीवर त्याची गोलंदाजी फायदेशीर ठरेल असं आम्हाला वाटलं. मला वाटत नाही की, गोलंदाजी युनिट म्हणून आम्ही आज चांगले होतो. एकंदरीतच आम्ही चांगलं क्रिकेट खेळलं नाही आणि त्याचा आमच्या संघावर चुकीचा परिणाम झाला.

एलिमिनेटर बद्दल पुढे हार्दिक म्हणाला, एलिमिनेटरमध्ये चांगलं क्रिकेट खेळणं, चांगल्या प्रकारे फलंदाजी, गोलंदाजी करणे आवश्यक आहे. फलंदाजीत आम्ही काय सुधारणा करू शकतो हे पहावे लागेल. गोलंदाजी विभाग म्हणून संपूर्ण स्पर्धेत आम्ही चांगली कामगिरी केली आहे.

मुंबई इंडियन्सचा संघ कोणत्या संघाविरूद्ध एलिमिनेटर सामना खेळणार हे आऱसीबी विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स (RCB vs LSG) दोन्ही संघात (27 मे) रोजी होणाऱ्या सामन्यानंतर निश्चित होईल.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---