शुक्रवारी (23 जून) वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी आणि वनडे संघांची घोषणा केली गेली. कसोटी संघाचा कर्णधार म्हणून रोहित शर्मा याच्याकडे जबाबदारी कायम ठेवली असून, पुनरागमन केलेल्या अनुभवी अजिंक्य रहाणेकडे पुन्हा एकदा संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. याव्यतिरिक्त संघात अनेक युवा खेळाडूंना देखील संधी मिळाली. मात्र, मागील दोन वर्षापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत असलेल्या मुंबईच्या सर्फराज खान याला पुन्हा एकदा डावलण्यात आले आहे.
सर्फराज याला लवकरच भारतीय संघात संधी मिळेल असे काही निवडसमिती सदस्यांनी म्हटले होते. चालू वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात त्याला संधी मिळाली नव्हती. याबाबत मोठा वाद झाल्यानंतर त्याला तिसऱ्या व चौथ्या कसोटीसाठी संघात स्थान मिळाले. परंतु, पदार्पण होऊ शकले नाही.
वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी यशस्वी जयस्वाल व ऋतुराज गायकवाड या युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. ते प्रथमच कसोटी संघाचा भाग असतील. मात्र, कमालीचे सातत्य दाखवूनही सर्फराजकडे का दुर्लक्ष केले जातेय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
सर्फराजने 2019-20 रणजी ट्रॉफीमध्ये सहा सामन्यात 154.44 च्या सरासरीने धावा काढल्या. त्याने 3 शतके आणि 2 अर्धशतकांसह 928 धावा केल्या. हाच जबरदस्त फॉर्म त्याने 2021-22 हंगामात सुरू ठेवला. त्याने 122.75च्या सरासरीने 4 शतके आणि 2 अर्धशतकांसह 982 धावा केल्या. तसेच यंदाच्या हंगामात देखील त्याची बॅट पुन्हा एकदा तळपली. अवघे सहा सामने खेळताना त्याने 92.66 अशा जबरदस्त सरासरीने 556 धावा केल्या. या व्यतिरिक्त इराणी ट्रॉफी व दुलीप ट्रॉफीमध्ये देखील त्याची कामगिरी उत्कृष्ट झाली होती.
वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ
रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.
(Mumbai Run Machine Sarfraz Khan Yet Again Ignored By Selection Committee For West Indies Tour)
महत्वाच्या बातम्या –
मोठी बातमी: ‘अजिंक्य’ रहाणे पुन्हा बनला टीम इंडियाचा उपकर्णधार, दीड वर्षानंतर पुनरागमन करताच मिळाली जबाबदारी
VIDEO । एलिस पेरीचं हार्टब्रेक! कारकिर्दीतील महत्वाच्या सामन्यात एक रन कमी पडल्याने हुकल शतक