घरच्या मैदानावर भारतीय संघ फेब्रुवारी-मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. चार सामन्यांची ही बॉर्डर-गावसकर ट्रॉफी भारतीय संघासाठी महत्वाची आहे. या सामन्यासाठी आपली निवड व्हावी असे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. काही भारतीय खेळाडू कसोटी सामनेच खेळतात. यामुळे ते या मालिकेसाठी निवडल्या जाणाऱ्या संघाची चातकाप्रमाणे वाट पाहत होते. काहींना संधी मिळाल्या, तर काहींची निराशा झाली. अशा स्थितीत एका भारतीय क्रिकेटपटूने विदेशात संधी शोधाव्या लागतील असे मत व्यक्त केले आहे.
भारतीय चाहते 2014चा इंग्लंड दौरा विसरणार नाही. त्या दौऱ्यात विराट कोहली (Virat Kohli) याची बॅट शांत राहिली. त्याला जेम्स ऍंडरसनच्या गोलंदाजीचा सामना करण्यास अडचण निर्माण होत होती. त्याच दौऱ्यात सलामीवीर मुरली विजय (Murali Vijay) किंवा एम विजयने 1000 पेक्षा अधिक चेंडूंचा सामना केला. तो आता भारताच्या कसोटी आणि स्थानिक संघांचाही भाग नाही, मात्र ती मालिका कोणीही विसरणार नाही. त्या मालिकेत तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तिसऱ्या आणि भारताकडून पहिल्या स्थानावर होता. त्याने 5 सामन्यात 40.20च्या सरासरीने 402 धावा केल्या होत्या.
विजयने भारताकडून शेवटचा सामना 2018मध्ये खेळला होता. त्यानंतर तो धावा करण्यात सतत अपयशी ठरला. तसेच त्याने शेवटचा स्थानिक सामना 2019च्या रणजी ट्रॉफीमध्ये खेळला. तो मागीलवर्षी झालेल्या तमिळनाडू प्रीमियर लीगचा (टीएनपीएल) भाग नव्हता. मात्र त्याने बीसीसीआयवर आपला राग व्यक्त केला. त्याने डब्ल्यू व्ही रमन यांच्या एका कार्यक्रमात म्हटले, “बीसीसीआयसोबत माझे काम पूर्ण झाले (हसत) आणि आता मी विदेशात संधी शोधत आहे. मला काही स्पर्धात्मक क्रिकेट खेळायचे आहे.”
विजयने काउंटी क्रिकेटही खेळले आहे. त्यामध्ये तो इसेक्सकडून खेळला. “वय 30 झाल्यानंतर भारतात लोक आम्हाला 80 वर्षाचे झालो अशा नजरेने पाहत असतात. मीडियाही आम्हाला वेगळ्या तर्हेने संबोधते. सध्या संधी कमी असल्याने मला बाहेर शोधाशोध करावी लागणार आहे,” असेही विजयने पुढे म्हटले.
विजयने भारताकडून 61 कसोटी सामन्यांच्या 105 डावांमध्ये 38.28च्या सरासरीने 3982 धावा केल्या आहेत. यामध्ये 12 शतके आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने 17 वनडे आणि 9 आंतरराष्ट्रीय टी20 सामनेही खेळले.
(Murali Vijay said I’m done with BCCI searching opportunities in abroad)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जड्डूची टीम इंडियात एंट्री एवढी पण सोपी नाही! ऑस्ट्रेलियाला भिडण्याआधी करावे लागेल ‘हे’ एक काम
ऑस्ट्रेलियन दिग्गजाने गायले सूर्याचे गोडवे! म्हणाले, ‘तो ज्याप्रकारे खेळतो ते पाहून विव रिचर्ड्सची आठवण..’