जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारताला गमवावा लागला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघाला 209 धावांनी पराभूत केले. या पराभवानंतर इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसेन यांनी खळबळजनक विधान केले आहे. त्यांनी भारतीय संघाला पाकिस्तानी कर्णधाराकडून शिकण्याचा सल्ला दिला आहे.
नासिर हुसेन (Nasser Hussain) यांनी म्हटले की, भारतीय संघाच्या फलंदाजांना बाबर आझम (Babar Azam) आणि न्यूझीलंड संघाच्या केन विलियम्सन (Kane Williamson) यांच्याकडून शिकले पाहिजे की, वेगवान गोलंदाजीविरुद्ध कशाप्रकारे फलंदाजी केली पाहिजे.
‘भारतीय फलंदाजांनी बाबर आझम आणि न्यूझीलंडच्या केन विलियम्सनकडून शिकावे’
डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यावर नासिर हुसेन म्हणाले की, “ज्याप्रकारे भारतीय फलंदाजांनी फलंदाजी केली, त्याने मी खूपच निराश आहे. मला वाटते की, भारतीय फलंदाजांना पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम आणि न्यूझीलंडच्या केन विलियम्सन याच्याकडून शिकले पाहिजे. खासकरून, भारतीय संघाच्या वरच्या फळीतील फलंदाजांनी. भारतीय फलंदाज पाकिस्तानच्या बाबर आझम आणि न्यूझीलंडच्या केन विलियम्सनकडून शिकू शकतात की, वेगवान गोलंदाजांविरुद्ध कशाप्रकारे फलंदाजी केली जाऊ शकते.” पुढे बोलताना ते असेही म्हणाले की, “जिथे चेंडू वेगवान होतो, तिथे भारतीय संघाच्या फलंदाजांना संघर्ष करावा लागतो.”
भारतीय फलंदाजांवर प्रश्नचिन्ह
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याविषयी बोलायचं झालं, तर भारतीय संघावर 209 धावांनी किताब गमावण्याची नामुष्की ओढावली. अशाप्रकारे ऑस्ट्रेलिया संघ पहिल्यांदा डब्ल्यूटीसी किताबाचा मानकरी बनला. तसेच, भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत झाला. या पराभवानंतर भारतीय फलंदाजांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. याव्यतिरिक्त सोशल मीडियावरही चाहते राग व्यक्त करत आहेत. मात्र, आता इंग्लंडचे माजी कर्णधार आणि समालोचक नासिर हुसेन यांनी भारतीय फलंदाजांना दिलेला सल्ला चर्चेचा विषय ठरत आहे. (nasser hussain on indian cricket team said batters need to learn from babar azam ind vs aus wtc final)
महत्वाच्या बातम्या-
आपलं गाऱ्हाणं सोशल मीडियावर मांडणं शुबमनच्या अंगलट, आयसीसीने दिली मोठी शिक्षा; लगेच वाचा
कशी नशिबाने थट्टा मांडली! आधी WTC Final गमावली, नंतर टीम इंडियाला बसला 115 टक्के दंडाचा फटका