बुधवारी (4 मार्च) बीसीसीआयने (BCCI) वरिष्ठ निवड समितीच्या नवीन अध्यक्षपदी भारताचे माजी फिरकीपटू सुनील जोशी (Sunil Joshi) यांची निवड केली आहे. त्यांच्या व्यतिरिक्त माजी मध्यमगती गोलंदाज हरविंदर सिंग (Harvinder Singh) यांचीही निवड समिती सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
निवड समितीचे माजी अध्यक्ष एमएसके प्रसाद यांची जागा जोशी तर, निवड समीतीचे माजी सदस्य गगन खोडा यांची जागा हरविंदर यांना देण्यात आली. मात्र, निवड समितीचे सदस्य देवांग गांधी, जतिन परांजपे आणि सरनदिप सिंग यांचा कार्यकाळ अजूनही संपलेला नाही.
सुनील जोशी आणि विराट कोहलीचे जूने नाते –
इंडियन प्रीमीयर लीगच्या (आयपीएल) सुरुवातीच्या वर्षात म्हणजेच 2008मध्ये कर्नाटककडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या जोशी यांची रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) या संघात निवड करण्यात आली होती. कारण त्यावेळी आयपीएल फ्रंचायझी स्थानिक खेळाडूंना अधिक प्राधान्य देत होते. त्यावेळी भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हा देखील या संघात सामाविष्ट होता.
त्यावेळेला विराटने नुकतेच 19 वर्षाखालील विश्वचषकात भारताला विजेतेपद मिळवून दिले होते. तर तेव्हा जोशी यांचे वय 37 वर्षे होते. पुढे जोशींनी 2008-2009मध्ये अवघे 4 आयपीएल सामने खेळले. ज्यात त्यांना केवळ 1 विकेट मिळवता आली. शिवाय यावेळी त्यांनी 2 डावात एकूण 6 धावा केल्या होत्या. त्यामुळे विराट आणि जोशी यांची ओळख आधीपासून आहे.
पुढे जाऊन विराट या संघाचा कर्णधार झाला. तर जोशी यांनी निवृत्ती घेत प्रशिक्षक म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली.
जोशी जरी आयपीएलमध्ये चमकू शकले नाहीत. तरी, त्यांची वनडे आणि कसोटी क्रिकेटमधील कारकीर्द चांगली आहे. तसेच, जोशी यांनी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रशिक्षक म्हणूनही चांगली कामगिरी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–निवड समितीत ‘या’ खेळाडूचाही होऊ शकतो समावेश; सौरव गांगुली इशारा…
-असं काय केलं की एकाच संघातील ते दोघेही ठरले सामनावीर पुरस्कारचे मानकरी
-धोनीबद्दलचा ‘तो’ प्रश्न ठरला निवडकर्त्यांच्या मुलाखतीत महत्त्वाचा