बुधवारी (4 मार्च) मुंबई (Mumbai) येथे क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) (Cricket Advisory Committee) राष्ट्रीय निवड समितीच्या (National Selector Committee) 2 पदांसाठी 5 उमेदवारांची मुलाखत घेतली. दरम्यान मुलाखतीवेळी सीएसीच्या सदस्यांनी भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या (MS Dhoni) भविष्याबद्दल उमेदवारांना प्रश्न विचारले.
भारताचे माजी क्रिकेटपटू मदन लाल (Madan Lal) अध्यक्ष असलेल्या सीएसीमध्ये आर.पी सिंग आणि सुलक्षणा नाईक यांचाही समावेश आहे. या तिघांनी राष्ट्रीय निवडकर्त्यांच्या पदाच्या मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांना ‘भारतीय संघात धोनीच्या भविष्याबद्दल तुमचे मत काय आहे?’, असा प्रश्न विचारला.
यासंदर्भात बीसीसीआयचा (BCCI) एक वरिष्ठ अधिकारी म्हणाला की, “हो, सीएसीने सर्व उमेदवारांना धोनीच्या भविष्यासंदर्भात एक प्रश्न विचारला होता. त्याचबरोबर धोनीला टी20 विश्वचषकासाठी निवडाल का?”, असाही प्रश्न यावेळी विचारला.
“धोनीच्या निवडीचा प्रश्न संवेदनशील आणि गुंतागुंतीचा आहे. त्यामुळे हा प्रश्न विचारण्याची गरज होती, असेही एका सूत्राने सांगितले.
राष्ट्रीय निवडकर्ता पदासाठी जवळपास 40पेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज केले होते. यापैकी सीएसीने लक्ष्मण शिवरामकृष्णन, वेंकटेश प्रसाद, राजेश चौहान, सुनील जोशी आणि हरविंदर सिंग यांना अंतिम 5 उमेदवार म्हणून निवडले. यातून मुलाखतीनंतर सुनील जोशी यांची निवड समीतीच्या अध्यक्षपदी निवड झाली. तर हरविंदर सिंग यांनी निवड समीती सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले.
जुलै 2019 मध्ये आयसीसी विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य सामन्यात स्विकाराव्या लागलेल्या पराभवानंतर धोनी एकदाही क्रिकेट सामना खेळताना दिसलेला नाही. परंतु आयपीएल 2020 चा 13वा हंगाम 29 मार्च पासून सुरु होणार आहे. यामध्ये धोनी चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. तसेच तो क्रिकेटमध्ये आयपीएलमधून पुनरागमनही करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
–टीम इंडियाविरुद्ध फायनल खेळताना ऑस्ट्रेलियाला जाणवणार ‘त्या’ खेळाडूची कमतरता
–सचिन तेंडुलकरचा टीम इंडियाला वर्ल्डकप फायनलआधी खास सल्ला….!
–४९ वर्षांपूर्वी या दिग्गजाने केले होते भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण