बुधवारी (5 मार्च) मुंबई (Mumbai) येथे क्रिकेट सल्लागार समितीने (Cricket Advisory Committee) वरिष्ठ निवड समीतीतील 2 रिक्त पदांच्या मुलाखतीसाठी जवळपास 40 उमेदवारांपैकी 5 उमेदवारांची अंतिम निवड केली होती. यामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज अजित आगरकरच्या (Ajit Agarkar) नावाचा उल्लेख केला नव्हता. त्यामुळे बऱ्याच जणांना आश्चर्याचा धक्काच बसला होता.
परंतु बीसीसीआयचा (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) आज (6 मार्च) आगरकरला निवडकर्ता समितीच्या पुढील टप्प्यात संधी मिळेल, असे स्पष्ट केले.
यावेळी 3 सदस्य असलेल्या सल्लागार समितीने अजित आगरकरव्यतिरिक्त माजी यष्टीरक्षक नयन मोंगिया आणि मोहिंदर सिंग यांचेही अर्ज मुलाखतीसाठी निवडले नव्हते. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, आगरकरसोबतच इतर उमेदवारांना पुढील टप्प्यात अर्ज करण्याची गरज नाही.
सध्या निवड समीतीमध्ये कायम असलेल्या जतिन परांजपे, शरणदीप सिंग आणि देवांग गांधी या 3 सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांच्या रिक्त होणाऱ्या पदासाठी या सर्व उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. यावेळी केलेले अर्ज पुढील टप्प्यापर्यंत ग्राह्य धरले जातील.
आगरकरसोबत इतर उमेदवारांना निवडकर्त्यांच्या पुढील टप्प्यातील निवडीसाठी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही, असे गांगुलीने स्पष्ट केले आहे. यावेळी अशी चर्चा होती की, आगरकरच निवड समीतीचा अध्यक्ष बनण्याच्या शर्यतीत सर्वात पुढे आहे. परंतु बीसीसीआयने विभागीय प्रणालीनुसार निर्णय घेतले. या निर्णयामुळे आगरकर निवडकर्त्यांच्या शर्यतीमधून बाहेर पडला.
सध्या मुंबई विभाग सांभाळणाऱ्या परांजपेचा कार्यकाळ फक्त 8 महिन्यांचा उरला आहे. इतर निवडकर्त्यांचा कार्यकाळ यावर्षी होणाऱ्या टी20 विश्वचषकानंतर संपेल.
तसेच सध्या नुकतेच सुनील जोशी यांना निवड समितीच्या अध्यक्षपदी निवडले आहे. त्यांच्या व्यतिरिक्त माजी मध्यमगती गोलंदाज हरविंदर सिंग यांचीही निवड समिती सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-असं काय केलं की एकाच संघातील ते दोघेही ठरले सामनावीर पुरस्कारचे मानकरी
-धोनीबद्दलचा ‘तो’ प्रश्न ठरला निवडकर्त्यांच्या मुलाखतीत महत्त्वाचा
-रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्याआधी सौराष्ट्रासाठी ही आहे सर्वात मोठी बातमी