बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेपूर्वी दोन्ही देशांच्या ‘अ’ संघांमध्ये सामना होणार आहे. ज्यामध्ये दोन चार दिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. जे या महिन्याच्या अखेरीस सुरूवात होण्याची शक्यता आहे.
या दौऱ्यासाठी भारत ‘अ’ संघाची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. पण आता बीसीसीआय लवकरच त्याची घोषणा करू शकते, अशी माहिती मिळत आहे. या मालिकेसाठी ऋतुराज गायकवाडला कर्णधार म्हणून पाहिले जाऊ शकते. ज्याने अलीकडेच इराणी चषक स्पर्धेत शेष भारताचे नेतृत्व केले आणि त्याचा संघ उपविजेता ठरला.
ईएसपीएन क्रिकइन्फोनुसार, अभिमन्यू ईश्वरन आणि साई सुदर्शन यांचीही 15 जणांच्या संघात निवड केली जाऊ शकते. या दोन्ही खेळाडूंनी अलीकडेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात बॅकअप सलामीवीर म्हणूनही त्याला दावा करण्याची संधी आहे. कर्णधार रोहित शर्मा पहिल्या दोन कसोटींपैकी एका कसोटीला मुकणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळेच बॅकअप सलामीवीराची लढत अतिशय रोचक असणार आहे.
याशिवाय देवदत्त पडिक्कल, बाबा इंद्रजीत आणि रिकी भुई या फलंदाजांनाही संघात संधी मिळू शकते. ईशान किशनसोबत अभिषेक पोरेलचाही यष्टिरक्षक म्हणून समावेश केला जाऊ शकतो. पुनरागमन करताना ईशानने बुची बाबू, दुलीप ट्रॉफी आणि रणजी ट्रॉफीमध्ये शतके झळकावली आहेत. अष्टपैलू नितीश कुमारही निवड समितीच्या रडारवर असेल. याशिवाय मुकेश कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी आणि यश दयाल या वेगवान गोलंदाजांनाही संधी मिळू शकते. तर फिरकी विभागातील अष्टपैलू मानव सुथार आणि तनुष कोटियन यांच्याकडे जबाबदारी दिली जाऊ शकते.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारत ‘अ’ चा संभाव्य संघ
ऋतुराज गायकवाड, अभिमन्यू इसवरन, देवदत्त पडिक्कल, साई सुदर्शन, बाबा इंद्रजीत, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), मुकेश कुमार, रिकी भुई, नितीश कुमार रेड्डी, मानव सुथार, नवदीप सैनी, खलील अहमद, तनुष कोटियन, यश दयाल
हेही वाचा-
IND vs NZ; कसोटीच्या चौथ्या दिवशी पावसाची शक्यता! टीम इंडियाच्या अडचणीत वाढ?
बंगळुरूचे मैदान गाजवायचे असेल तर, रोहित सेनेला कराव्या लागतील या 5 गोष्टी
रोमांचक सामन्यात न्यूझीलंडचा विजय, आफ्रिकेविरुद्ध होणार जेतेपदाचा सामना