टीम इंडियाचा (Team india) दिग्गज भारत ‘ए’ सामन्यांच्या माध्यमातून स्वतःला इंग्लंड विरुद्ध तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. तत्पूर्वी 20 जून पासून होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी कोणते खेळाडू अंतिम इलेव्हनचा भाग असतील आणि कोण नसतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. वास्तवात सामना इतका महत्त्वाचा असणार आहे की, जसा वेळ जाईल त्याप्रमाणे या चर्चांना अजून वेग येणार आहे. आता माजी दिग्गज रिकी पॉंटिंग (Riki ponting) यांनी म्हटले आहे की, भारतीय संघातील शानदार फलंदाज साई सुदर्शनला (Sai surdarshan) प्लेइंग इलेव्हनचा भाग करायला हवे.
पॉंटिंग म्हणाले मला वाटते की, साई सुदर्शनला संघात सामील करण्याची ही खरी वेळ आहे. इमानदारीने बोलायचे झाल्यास, भारतीय संघाची ओळख आता थोडी वेगळ्या पद्धतीने होणार आहे कारण रोहित (Rohit Sharma) आणि विराट (Virat Kohli) आता संघात नसणार आहेत. ते म्हणाले, जर साई सुदर्शनला ओपनर खेळाडू म्हणून खेळवले जात असेल तर अनुभवी खेळाडूंना मधल्या फळीत खेळवले जाऊ शकते. साईने घरेलू क्रिकेटमध्ये खूप शानदार फलंदाजी केली आहे आणि हा महत्त्वाचा निर्णय या परिस्थितीत इंग्लंडच्या अवघड आक्रमणातून त्यांना तोंड देण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.
पुढे बोलताना ते म्हणाले, जर जयस्वाल (Yashasvi jaiswal) आणि सुदर्शन (Sai surdarshan) यांनी खेळाची सुरुवात केली तर तीन नंबर वर थोड्या अनुभवी फलंदाजाची गरज पडेल, ही भूमिका के एल राहुल (KL Rahul) किंवा करून नायर (Karun Nair) यांच्यातील कोणीही निभावू शकतो आणि कर्णधार गिल (shubman gill) चौथ्या स्थानावर फलंदाजी करू शकतो.
तसेच आता की राहुलने शतक झळकावून भारतीय प्रबंधन व्यवस्थापनाला सांगितले आहे की, आता त्याच्याविषयी वेगवेगळ्या चर्चा करण्याची गरज नाही. इंग्लंड लॉन्स विरुद्ध शुक्रवार रोजी झालेल्या सरावा सामन्यादरम्यान पहिल्या दिवशी के एल राहुलने 116 धावा करून सिद्ध केले की, मागच्या वेळेस तो पांढऱ्या चेंडू फॉरमॅटमध्ये व्यस्त होता पण आता तो रेड चेंडूसाठी पूर्णपणे तयार आहे.