वेलिंगटन। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात आज(3 फेब्रुवारी) पाचवा वनडे सामना वेस्टपॅक स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 49.5 षटकात सर्वबाद 252 धावा केल्या.
यावेळी भारताच्या चार विकेट्स अवघ्या 18 धावांवर गेल्या. तरीही यानंतर आलेल्या अंबाती रायडू (90), विजय शंकर (45), केदार जाधव (34) आणि हार्दिक पंड्या (45) यांनी केलेल्या धावांच्या जोरावर भारताने 250 धावांचा टप्पा गाठला आहे.
वन-डेमध्ये 4 विकेट्स 20 धावांच्या आत गमावल्या नंतरही 250 धावांचा टप्पा गाठण्याचा पराक्रम भारताने दुसऱ्यांदा केला आहे.
1983च्या विश्वचषकात भारताने झिम्बाब्वे विरुद्ध 9 धावांवर 4 विकेट्स गमावल्या होत्या. यावेळी भारताने 8 विकेट्स गमावत 266 धावा केल्या होत्या. हा सामना भारताने 31 धावांनी जिंकला होता. त्यानंतर भारताने सामने जिंकत तो विश्वचषकही आपल्या नावे केला होता.
झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात भारताने सुनिल गावसकर, के श्रीकांत, मोहिंदर अमरनाथ आणि संदिप पाटील या चार विकेट्स अवघ्या 9 धावांवरच गमावल्या होत्या. त्यानंतर आलेल्या कर्णधार कपिल देवने नाबाद 175 धावांची खेळी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
–रायडू-विजय जोडी चमकली, संघाला संकटातून बाहेर काढताना केला हा मोठा पराक्रम
–विराट कोहली-स्म्रीती मंधानाच्या बाबतीत घडला हा खास योगायोग
–वनडेत या गोलंदाजांविरुद्ध हार्दिक पंड्याने केली आहे षटकारांची हॅट्रिक