भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने नुकतेच विराट कोहलीवर एकदाही आयपीएल ट्रॉफी न जिंकल्याने टीका केली आहे. पण या टीकेनंतर चेन्नई सुपर किंग्जचे प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांनी मात्र विराटला पाठिंबा दिला आहे.
कोलकता नाईट रायडर्सचे नेतृत्व करताना 2012 आणि 2014 मध्ये आयपीएल विजेतेपद मिळवलेल्या गौतमने म्हटले आहे की विराट भाग्यशाली आहे, त्याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने अजूनही कर्णधारपदावर कायम ठेवले आहे. विराटने 2011 पासून बेंगलोर संघाचे नेतृत्व केले आहे. पण त्याला एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही.
पण फ्लेमिंग म्हणाले, ‘एकटा खेळाडू आयपीएल जिंकू शकत नाही. विजतेपद मिळवण्यासाठी ही कठिण स्पर्धा आहे आणि ती कठिण होत चालली आहे. कारण संघ हुशार होत चालले आहेत. खेळाडूंना आयपीएल खेळण्यासाठी तयार केले जात आहे. प्रशिक्षक आणि व्यवस्थापक कोणाला खरेदी करायचे आणि संघाला एकत्र कसे ठेवायचे याबाबत चतुर झाले आहेत.’
त्याचबरोबर विराटचे कौतुक करताना ते म्हणाले, ‘तूम्ही जगातले सर्वोत्तम फलंदाज किंवा कदाचीत जगातील सर्वोत्तम खेळाडू असला तरी याचा अर्थ असा नाही की तूम्हाला आयपीएलमध्येही यश मिळेल. यासाठी अनेक गोष्टी लक्षात घ्यावा लागतात. मला एक माहित आहे, जेव्हा त्याच्यासमोर एखादे आव्हान ठेवले जाते, तेव्हा तो पूर्ण करतो.’
आयपीएल 2019 ला आजपासून(23 मार्च) सुरुवात होणार आहे. आज पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–आयपीएल सुरु होण्याआधीच मुंबई इंडियन्ससाठी ही आहे निराशाजनक बातमी…
–हा दिग्गज क्रिकेटपटू म्हणतो, विश्वचषकात खेळणाऱ्या खेळाडूंसाठी आयपीएल महत्त्वाची…
–एकाच सामन्यात सारखाच पराक्रम करण्यासाठी विराट कोहली, सुरेश रैनामध्ये चुरस