आयसीसी महिला वनडे विश्वचषक २०२२ ही स्पर्धा अंतिम चरणात पोहोचली आहे. या विश्वचषकातील २८ वा सामना रविवारी (२७ मार्च) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात झाला. भारतीय संघासाठी ‘करा अथवा मरा’ अशी स्थिती असलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकाने ३ विकेट्स राखून विजय मिळवला आहे. त्यामुळे भारतीय संघाचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे.
उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या इतक्या नजीक येऊन भारतीय संघ शेवटी शर्यतीतून बाहेर (Indian Women Out Of World Cup) पडल्यानंतर क्रिकेटविश्वातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) यानेही महिला संघाबाबत प्रतिक्रिया दिली (Virat Kohli On Indian Women Team) आहे. विराटने विश्वचषकासारख्या मार्की स्पर्धेतील भारतीय महिला संघाच्या लढाऊ भावनेबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.
विराटने ट्वीट करत लिहिले आहे की, ‘जिंकण्याचे ध्येय असलेल्या स्पर्धेतून बाहेर पडणे नेहमीच कठीण असते, परंतु आमचा महिला संघ ताठ मानेने सर्वत्र वावरू शकतो. तुम्ही विश्वचषक जिंकण्यासाठी तुमचे सर्वश्रेष्ठ प्रयत्न केले आणि आम्हाला तुमचा अभिमान आहे.’
Always tough to bow out of a tournament you aim to win but our women's team can hold their heads high. You gave it your all and we are proud of you. ????????????????
— Virat Kohli (@imVkohli) March 28, 2022






