पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज यांच्यातील एकदिवसीय मालिका बुधवारी (८ जून) सुरू झाली. उभय संघातील पहिला सामना पाकिस्तानने जिंकला. या विजयासाठी कर्णधार बाबर आजमने शतकीय खेळीचे योगदान दिले. या अप्रतिम प्रदर्शनानंतर चाहत्यांनी आणि जाणकारांनी त्याचे कौतुक केलेच, पण सामना संपल्यानंतर बाबरने केलेल्या एका कृत्यामुळे तो जास्तच चर्चेत आला.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम (Babar Azam) याने वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात १०७ चेंडू खेळले आणि यामध्ये १०३ धावा केल्या. मालिकेतील हा पहिला सामना मुलतानमध्ये खेळला गेला आणि वेस्ट इंडीजने यामध्ये प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडीज संघाने ५० षटकात ८ विकेट्सच्या नुकसानावर ३०५ धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाढलाग करताना बाबरने संघासाठी विजयाचा पाया उभा केला. या प्रदर्शनासाठी त्याला सामनावीन निवडले गेले होते, पण त्याने हा पुरस्कार स्वतः न घेता संघातील सहकारी खेळाडू खुशदिल शाह (Khushdil Shah) याला देण्याचा निर्णय घेतला.
Great gesture by the captain @babarazam258https://t.co/XcULnKaMGH
— Ibrahim Badees (@IbrahimBadees) June 8, 2022
सामना संपल्यानंतर पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात सामनावीर ठरेलल्या बाबरचे कौतुक होत होते. पुरस्कार मिळाल्यानंतर त्याला चेंडूवर स्वाक्षरी करायची होती, पण चेंडू हातात न घेता त्याने माईक पकडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करणारा व्यक्ती बाबरला म्हणाला की, तुम्हाला चेंडूवर स्वाक्षरी करायची आहे, तेव्हा बाबर म्हणाला की, तो स्वतःला मिळालेला सामनावीर पुरस्कार खुशदिल शाहला देऊ इच्छितो. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांना त्याच्या मनाचा मोठेपणा भावला आहे. व्हिडिओवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, बाबर आजमने जरी या सामन्यात पाकिस्तानसाठी सर्वाधिक धावा केल्या असल्या, तरी खुशदिल शाहने शेवटच्या षटकांमध्ये खिंड लढवली. खुशदिलने अवघ्या ४१ धावा केल्या, पण विजयासाठी त्याच्या या धावा महत्वाच्या ठरल्या. बाबरने ४२व्या षटकात विकेट गमावल्यानंतर खुशदिलने शेवटच्या षटकांमध्ये ताबडतोड प्रदर्शन केले आणि शेवटच्या षटकात संघाला विजय मिळवून दिला. या धावा करण्यासाठी त्याला अवघ्या २३ चेंडूंचा सामना करावा लागला.
उभय संघातील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर पाकिस्तानला विजयासाठी ३०६ धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे त्यांनी ४९.२ षटकात गाठले. वेस्ट इंडीजसाठी त्यांचा सलामीवीर शाय होपने सर्वाधिक १२७ धावा केल्या, तर दुसरीकडे पाकिस्तानचा गोलंदाज हॅरिस रऊफने ७७ धावा खर्च करून सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सला IPL 2022मध्ये मिळालाय ‘हिरा’, तो ‘बेबी एबी’ नाव सार्थ करणारंच!
रिषभ पंत असेल भारताचा टी२०तील आठवा कर्णधार, पाहा याआधीच्या कॅप्टन्सची लिस्ट आणि त्यांची कामगिरी
इंग्लंडने ३ रनांनी मॅच मारली, आणि ऑस्ट्रेलियाच्या ‘त्या’ ऐतिहासिक पराभवामुळे हसी क्रिकेटर झाला