टी२० विश्वचषक २०२२ ऑस्ट्रेलियामध्ये ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान खेळला जाणार आहे. या स्पर्धेत सुपर १२ आणि क्वालिफायरचे मिळून एकूण २० संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत संघांचे दोन गट करण्यात आले असून भारत आणि पाकिस्तान यांना एकाच गटात ठेवले आहेत.
या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान २३ ऑक्टोबरला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड येथे आमने-सामने येणार आहेत. या सामन्याला अजून भरपूर कालावधी शिल्लक असताना यामध्ये कोणत्या संघाचे पारडे जड ठरेल याचे अंदाज लावले जात आहेत. पाकिस्तान संघाचा महान वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने भारताचा संघ यावेळी पाकिस्तानला चांगलाच भारी पडणार आहे, असे मत व्यक्त केले आहे.
मागील वर्षी झालेल्या सामन्यात भारतीय संघाची घोर निराशा झाली होती. ते प्रथमच टी२० विश्वचषकात पाकिस्तानकडून पराभूत झाले होते. साखळी सामन्यात पाकिस्तानने भारतावर १० विकेट्सने विजय मिळवला होता.
“मेलबर्नची खेळपट्टी विकेटसाठी पूरक आहे. या सामन्यात जर पाकिस्तानने दुसरी गोलंदाजी केली, तर ते सामना जिंकू शकतात. तसेच १ लाख प्रेक्षकक्षमता असलेल्या या स्टेडियममध्ये ७० हजारांच्या जवळपास भारतीय चाहते असतील, तर पाकिस्तानवर थोडा दबाव जाणवेल,” असे माजी भारतीय फिरकीपटू हरभजन सिंगने प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
याच्या प्रत्युत्तरात अख्तरने स्पोर्ट्सकीडाशी बोलताना म्हटले की, “पाकिस्तानसाठी भारत असाच कोणताही संघ पाठवणार नाही. यावर्षी भारत उत्तम संघ निवडणार आहे. यामुळे भारताला हरवणे अवघड जाईल.”
“भारताने जर योग्य संघ निवडला त्यांच्याकडे पाकिस्तानला हरवण्याची संधी आहे. त्यांचा संघ हा मजबूत वाटत असला तरी सामन्यांचे काय निकाल असतील हे सांगता येत नाही,”असेही अख्तरने पुढे म्हटले आहे.
मागील काही सामन्यांत तसेच आयपीएलमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांची निराशाजनक कामगिरी झाली. त्यामुळे या दोघांवर माजी खेळाडूंची टीका सुरूच आहे. त्यातच अख्तरने त्यांची पाठराखण करत म्हटले, “दोघेही लवकरच चांगले कामगिरी करतील. तसे नाही झाले, तर हा विश्वचषक त्यांचा शेवटचा विश्वचषक ठरू शकतो.”
“विराटने ठरवले तर तो तिन्ही प्रकारात खेळू शकतो नाही, तर कसोटी सामन्यापर्यंत त्याची कामगिरी राहिल. त्याने ११० शतके करावी अशी माझी इच्छा आहे. मात्र, त्यासाठी त्याला प्रत्येकवर्षीच उत्कृष्ठ कामगिरी करावी लागेल,” असेही अख्तर पुढे म्हणाला.
भारत विरुद्ध पाकिस्तानचे सामने हे फक्त आयसीसीच्या स्पर्धेपुरतेच मर्यादित राहिले आहेत. त्यामुळे यावर्षीच्या भारत-पाकिस्तान टी२० विश्वचषक (T20 World Cup) या महत्वाच्या सामन्याची तिकीटे आधीच विकली गेली आहेत, तर दोन्ही देशाचे माजी खेळाडू आणि संघाचे चाहते या सामन्यासाठी उत्साहित आहेत.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पुढच्या आयपीएलमध्ये सीएसके काय बदल करणार? खूपच मोठीये यादी
एवढं कौतुक झालेल्या राजवर्धनला चेन्नईने बसूनच ठेवलं, का नाही मिळाली संधी?
टी-२० मालिका INDvsSA संघाची, पण टीम इंडियाकडे पाकिस्तानचा जबर विक्रम मोडण्याची संधी