यजमान वेस्ट इंडीजने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा वनडे सामना ४ गड्यांनी जिंकत तीन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. ऑस्ट्रेलियाने पावसाने पावसाने बाधित झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी केली आणि ४७.१ षटकांत १८७ धावा केल्या. त्यानंतर वेस्ट इंडीज संघाने ३८ षटकांत ६ गडी गमावून १९१ धावा करुन सामना जिंकला. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार हा सामना (२२ जुलै) गुरुवारी होणार होता. मात्र, वेस्ट इंडीजच्या पथकातील एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने हा सामना पुढे ढकलला गेलेला.
सामन्यात वेस्ट इंडिजचा निकोलस पूरन नाबाद अर्धशतक झळकावून आपल्या संघाला जिंकण्यात यशस्वी झाला. या सामन्यात जिथे वेस्ट इंडिजला विजय मिळाला, दुसरीकडे अशीच एक अन्य घटना घडली जी सोशल मीडियावर चर्चेत येत आहे. ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या १६ व्या षटकात हुसेनने नो-बॉल टाकला, त्यानंतर जे घडले ते चकित करणारे होते.
अशी घडली घटना
ऑस्ट्रेलियन डावातील सोळावे षटक वेस्ट इंडीजचा अकील हुसेन टाकत होता. या षटकातील दुसरा चेंडू नो-बॉल टाकला गेला. ज्यावर एकही धाव गेली नाही. त्यामुळे फलंदाजाला फ्री हिट मिळाली. नियमानुसार जर नो-बॉलवर स्ट्राइक बदलली नसेल तर, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला क्षेत्ररक्षण बदलता येत नाही. मात्र, यावेळी वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्डने काहीशी आगळीक केली. त्याने कुठलाही विचार न करता सरळ मैदान सोडले. वेस्ट इंडीजने पुढील चेंडूवर १० क्षेत्ररक्षकांसह क्षेत्ररक्षण केले. त्याच्या या कृत्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.
One for the 'never seen that before' pile: No-ball called, so field must stay the same for the free hit. But Pollard (understandably) has no interest in staying at short leg where he had been standing. So he goes off the field and WI field with 10 men for the free hit #WIvAUS pic.twitter.com/LcYrAZCHHE
— Louis Cameron (@LouisDBCameron) July 24, 2021
Remember Graeme Swann doing it once in an ODI against Australia pic.twitter.com/B2VtH2obH9
— Andrew McGlashan (@andymcg_cricket) July 24, 2021
यापूर्वीदेखील घडली आहे अशी घटना
विशेष म्हणजे क्रिकेट मैदानावर अशी घटना घडण्याची ही पहिली वेळ नाही. कारण, इंग्लंडचा ऑफस्पिनर ग्रॅमी स्वानने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सामन्यात असेच कृत्य केले होते. या प्रकारामुळे आता सोशल मीडियावरील लोकांनी पंचांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. या विजयामुळे मालिका आता बरोबरीत आली असून, मालिकेतील शेवटचा सामना २७ जुलै रोजी खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या –
अरेरे! भारताची एकमेव जिम्नॅस्ट प्रणती नायक फायनल्समध्ये स्थान मिळवण्यात अपयशी
Video: चाहत्यांना मिळाला ‘इंडियन मलिंगा’, टीएनपीएलमध्ये घालतोय धुमाकूळ






