भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात जाऊन सलग दुसर्यांदा कसोटी मालिका जिंकत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली मागील दौर्यात कसोटी मालिका जिंकली होती. त्यानंतर भारतीय संघाने पुन्हा एकदा अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली कसोटी मालिकेत विजय मिळवला. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाचे माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग स्तब्ध झाले आहेत. त्यांना भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाला कसे पराभूत केले, हे अजून समजले नाही. यावर प्रतिक्रीया देताना ते म्हणाले, ही मालिका भारताच्या अ संघाने जिंकली.
ऑस्ट्रेलिया आणि भारत संघात मंगळवारी बॉर्डर गावसकर मालिकेतील चौथा सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाच्या नवोदित खेळाडूंनी उत्तम प्रदर्शन करताना ऑस्ट्रेलिया संघावर 3 विकेट्सने विजय मिळवला. त्याचबरोबर भारतीय संघाने बॉर्डर गावसकर चार सामन्यांची कसोटी मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. तसेच गाबा येथील मैदानावर 32 वर्षांनी पहिला विजय मिळवत इतिहास रचला. रिकी पाँटिंगने भारतीय संघ विजयाचा हक्कदार होता असे म्हणत प्रतिक्रिया दिली आहे.
रिकी पाँटिंग सामन्यानंतर चर्चा करताना म्हणाले, “मी स्तब्ध आहे की, ऑस्ट्रेलिया संघ ही मालिका जिंकू शकला नाही. हा तर भारताचा अ संघ होता आणि तरी ही त्यांनी हा सामना जिंकला. भारतीय संघ मागील 5-6 आठवडय़ात ज्या परिस्थितीतून गेली आहे. कर्णधार माघारी गेला, खेळाडूंना दुखापत झाली. त्यामुळे भारतीय संघ आपला मजबूत संघ उतरवू शकला नाही. ऑस्ट्रेलिया संघ तर पूर्णपणे मजबूत संघासोबत खेळला. फक्त सुरुवातीला डेविड वॉर्नर सहभागी झाला नव्हता.”
रिकी पाँटिंग पुढे म्हणाले, “हा भारताचा दुसरा निवडला गेलेला संघ सुद्धा नव्हता, कारण यांच्यामध्ये भुवनेश्वर कुमार आणि इशांत शर्मा सुद्धा नव्हते. रोहित शर्मा सुद्धा फक्त शेवटचे दोन सामने खेळला. त्यांनी शानदार क्रिकेट खेळले. कसोटी सामन्यातील सर्व निर्णायक क्षणी चांगली कामगिरी केली. मात्र त्या ठिकाणी ऑस्ट्रेलिया संघ करू शकला नाही. दोन्ही संघात हाच फरक आहे. त्यामुळे भारतीय संघ या विजयाचा हक्कदार आहे. ”
उल्लेखनीय म्हणजे भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्यांची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी रिकी पॉटिंगने एक वक्तव्य केले होते. ज्यामध्ये तो म्हणाला होता, ऑस्ट्रेलिया संघ पाहुण्या संघावर एकहाती विजय मिळवेल. त्याचबरोबर भारतीय संघावर 4-0 या फरकाने विजय मिळवेल.
महत्वाच्या बातम्या:
म्हणून भारतीय संघाच्या विजयानंतर राहुल द्रविडची होतेय चर्चा
आयपीएल २०२१ : जाणून घ्या कोणत्या संघाने किती खेळाडूंना केले मुक्त आणि कोणत्या खेळाडूंना केले कायम
BAN vs WI : शाकिब अल हसनच्या दमदार पुनरागमनाच्या जोरावर बांग्लादेशचा विंडीजवर ६ गड्यांनी विजय