---Advertisement---

मराठीत माहिती- क्रिकेटर पार्थसार्थी शर्मा

---Advertisement---

संपुर्ण नाव- पार्थसार्थी हरिश्चंद्र शर्मा

जन्मतारिख- 5 जानेवारी, 1948

जन्मस्थळ- अल्वार, राजस्थान

मृत्यू- 20 ऑक्टोबर, 2010

मुख्य संघ- भारत आणि राजस्थान

फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज

गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज

आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण-  भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, तारिख – 11 ते 15 डिसेंबर, 1974

आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध न्यूझीलंड, तारिख – 22 फेब्रुवारी, 1976

आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द- 

फलंदाजी- सामने- 5, धावा- 187, शतके- 0

आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-

फलंदाजी- सामने- 2, धावा- 20, शतके- 0

थोडक्यात माहिती- 

-शर्मा हे एक उत्तम अष्टपैलू क्रिकेटपटू होते. ते चांगली फलंदाजी करू शकत होते. फिरकी गोलंदाजी करू शकत होते आणि चांगल्या विकेट्सही घेऊ शकत होते. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांना आपल्या गोलंदाजी शैलीला चांगल्या प्रकारे मांडता आले नाही.

-अल्वार येथे जन्मलेल्या पार्थसार्थी शर्मा यांनी युवा वयात आपल्या अष्टपैलू शैलीने दिग्गज सलीम दुराणी यांना प्रभावित केले होते. ज्यामुळे त्यांना प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये संधी मिळाली होती.

-त्यांनी 14 वर्षाच्या वयात 1960पुर्वी राजस्थान संघाकडून रणजी ट्रॉफीत पदार्पण केले होते. त्यावेळेला  राजस्थानने एका डावाच्या आघडीवर उत्तर प्रदेशला पराभूतही केले होते. मात्र, या सामन्यात शर्मा यांनी फलंदाजी करताना एकही धाव घेता आली नव्हती. तसेच गोलंदाजी करताना एकही विकेट घेता आली नव्हती. एवढेच नाही तर क्षेत्ररक्षण करताना त्यांना एक झेलही घेता आला नव्हता.

-1974 साली दिल्लीविरुद्धच्या कसोटी सामन्यात सुनील गावसकर आणि मंसुर अली खान पतौडी यांना दुखापत झाल्याने शर्मा यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची दारे खुली केली होती. त्यानंतर त्यांनी पदार्पणाच्या कसोटी सामन्यात 5व्या क्रमांकावर फलंदाजी करत 54 धावांची खेळी केली होती.

-1977-78मध्ये इराणी ट्राफीत भारतीय शेष संघाकडून फलंदाजी करताना त्यांनी बॉम्बे संघाविरुद्ध एका डावात 206 धावा केल्या होत्या. यासह त्यांनी इराणी ट्रॉफीत सर्वोत्कृष्ट धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला होता.

-शर्मा यांनी प्रथम श्रेणी कारकिर्दीत जरी 152 सामन्यात 191 विकेट्स घेतल्या असतील तरी त्यांना आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत केवळ 7 सामन्यात 4 षटके गोलंदाजी करता आली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर एकही विकेट नाही.

-राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये असताना पार्थसार्थी यांनी गौतम गंभीर, राहूल द्रविड यांना मार्गदर्शन केले होते. शिवाय रॉबीन उतप्पा, सुरेश रैना, पियुष चावला आणि अमित मिश्रा या युवा खेळाडूंनाही त्यांनी मार्गदर्शन केले होते.

2009मध्ये शर्मा हे मनोज प्रभाकर यांच्या जागी रणजी ट्रॉफीसाठी राजस्थान संघाचे प्रशिक्षक बनले. त्यांनी प्रशिक्षकपद सांभाळताच उत्तर प्रदेशमधील गोलंदाज पंकज सिंग यांना राजस्थान संघाकडून खेळण्यासाठी विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देत पंकज संघात सामील झाले आणि तो त्यावेळी रणजी ट्रॉफीतील सर्वोत्तम गोलंदाज ठरला होता.

-20 ऑक्टोबर 2010ला कॅन्सरमुळे वयाच्या 62व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---