संपुर्ण नाव- रविशंकर जयद्रथ शास्त्री
जन्मतारिख- 27 मे, 1962
जन्मस्थळ- बॉम्बे (आताची मुंबई), महाराष्ट्र
मुख्य संघ- भारत, ग्लॅमॉर्गन आणि मुंबई
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- डाव्या हाताचे फिरकी गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध न्यूझीलंड, तारिख – 21 ते 25 फेब्रुवारी, 1981, ठिकाण – वेलिंग्टन
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 25 नोव्हेंबर, 1981, ठिकाण – अहमदाबाद
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 80, धावा- 3830, शतके- 11, सर्वोत्तम कामगिरी – 206 धावा
गोलंदाजी- सामने- 80, विकेट्स- 151, सर्वोत्तम कामगिरी- 5/75
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 150, धावा- 3108, शतके- 4, सर्वोत्तम कामगिरी – 109 धावा
गोलंदाजी- सामने- 150, विकेट्स- 129, सर्वोत्तम कामगिरी- 5/15
थोडक्यात माहिती-
-भारतीय संघाचे प्रशिक्षक रवि शास्त्री हे माटुंगा येथील डॉन बॉस्को हायस्कूलमध्ये शिकले आहेत.
-त्यांनी 14वर्षाच्या वयात डॉन बॉस्कोमधून क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. त्यापुर्वी शाळेचे क्रिकेट खेळात विशेष नाव नव्हते. मात्र, शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या शाळेला वेगळीच ओळख मिळवून दिली. 1976मध्ये त्यांचा संघ गिल्स शिल्ड इंटरस्कूल स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात (14 वर्षांखालील मुलांसाठीचे क्रिकेट) पोहोचला आणि पुढील वर्षात विजयही मिळवला.
-शास्त्री यांची चुलत बहीण स्विमिंग आणि वॉटर पोलोमध्ये भारताकडून खेळली आहे.
-शाळेयवयातील त्यांच्या कामगिरीने त्यांना रणजी ट्रॉफीत खेळण्याची संधी मिळाली. त्यांनी 17व्या वर्षी मुंबई संघाकडून रणजी ट्रॉफीत पदार्पण केले होते. त्यावेळी मुंबईकडून खेळणारे ते सर्वात युवा खेळाडू होते.
-भारतीय देशांतर्गत क्रिकेटच्या इतिहासात उल्लेखनीय ठरलेल्या मुंबई विरुद्ध दिल्ली संघातील 1984-85मधील रणजी ट्रॉफीचा अंतिम सामन्यात शास्त्री यांनी 91 धावा देत 8 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे मुंबई संघाला त्यांच्या 50व्या वर्धापन दिनाच्या दिवशी 30वा चषक जिंकण्याचा मान मिळाला होता.
-1985मध्ये बडोदा विरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यात शास्त्री यांनी फटकेबाजी करत त्यांच्या कारकिर्दीतील वेगवान द्विशतक ठोकले होते. त्यांनी 80 चेंडूत शतक केले होते त्यानंतर त्यांनी 43 चेंडूत पुढील 100 धावा करत द्वशतक केले.
-शिवाय या सामन्यात त्यांनी एक नवा विक्रम नोंदवला होता. बडोदाच्या फिरकीपटू टिलक राज यांच्या षटकात शास्त्री यांनी 6 चेंडूत 6 षटकार ठोकले होते. त्यांच्यापुर्वी असा विक्रम केवळ वेस्ट इंडिजच्या गॅरि सोबर्स यांनी केला होता.
-1981मध्ये इराणी ट्रॉफीत शास्त्री यांनी 9/101 ही गोलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरी केली होती. त्यांनी केलेला हा विक्रम पुढे 20 वर्षे अबाधित राहिला.
-6फूट 3इंच उंची असणाऱ्या शास्त्री यांनी 1981 मध्ये वेलिंग्टन येथे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून त्यांनी कसोटीत पदार्पण केले होते.
-शास्त्री हे सुरुवातीला भारतीय संघाचे डाव्या हाताचे फिरकीपटू होते. तर संघात ते 10व्या क्रमांकाला फलंदाजी करत होते. त्यांनी पदार्पणाच्या नंतर 18 महिने त्यांच्या फलंदाजीत खूप सुधारणा केली आणि कसोटी कारकिर्दीच्या शेवटच्या काही सामन्यापर्यंत त्यांनी पहिल्या क्रमांकापासून ते दहाव्या क्रमांकापर्यंत सर्व स्थानावर फलंदाजी केली होती.
-शास्त्री यांच्यासाठी 1985मधील ऑस्ट्रेलियीतील चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स मालिका अविस्मरणीय ठरली होती. त्यावेळी भारताने सर्व सामने जिंकले होते आणि शास्त्री हे तेव्हाचे स्टार परफॉर्मर होते. त्यांनी यावेळेला एकूण 182 धावा आणि 8 विकेट्स घेतल्या होत्या. शिवाय त्यांना मालिकावीर पुरस्कारही मिळाला होता. तसेच, त्यांना त्यांच्या कामगिरीसाठी ऑडी 100 कारही देण्यात आली होती.
-वयाच्या 30व्या वर्षी गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्यांना निवृत्ती घ्यावी लागली.
-शास्त्री यांच्या युवा वयात बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंगशी त्याची चांगली मैत्री होती. मात्र, त्यांनी रितु सिंग यांच्याशी लग्न केले आणि 22 वर्षानंतर त्यांच्याच घटस्पोट झाला.
-शास्त्री हे युएनआयसीइएफचे राष्ट्रीय ब्रॅंड ऍम्बेसिडर होते. हा मान सचिन तेंडुलकरलाही मिळाला आहे.
-शास्त्री यांनी निवृत्तीननंतर समालोचक म्हणून काम केले. त्यांनी 2007च्या टी20 विश्वचषक आणि 2011च्या क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात समालोचन केले होती.
-2014पासून ते 2016पर्यंत शास्त्री हे भारतीय संघाचे संचालक होते. त्यानंतर 2018 पासून ते भारतीय संघाचे प्रशिक्षक आहेत.