संपुर्ण नाव- सुरिंदर चमनलाल खन्ना
जन्मतारिख- 3 जून, 1956
जन्मस्थळ- दिल्ली
मुख्य संघ- भारत आणि दिल्ली
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
क्षेत्ररक्षणाची जागा – यष्टीरक्षक
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, तारिख – 9 जून, 1979
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 10, धावा- 176, शतके- 0
थोडक्यात माहिती-
-1980च्या दशकात सय्यद किरमानी यांच्यासारखे यष्टीरक्षक भारतीय संघात असल्याने कोणत्या युवा यष्टीरक्षकाला भारतीय संघात संधी मिळण्याची शक्यता खूप कमी होती. तर, भारत रेड्डी यांच्यासारख्या अजून एका यष्टीरक्षकामुळे सुरिंदर चमनलाल खन्ना यांना कसोटीत यष्टीरक्षणाची संधी मिळाली नव्हती.
-मात्र, मर्यादित षटकांच्या सामन्यात त्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करत चांगली कामगिरी केली. त्यांनी 10 वनडे सामन्यात यष्टीमागे 8 विकेट्स घेतल्या. ज्यात 4 विकेट्स त्यांनी फलंदाजाला झेलबाद करत तर 4 विकेट्स फलंदाजाला यष्टीचीत करत घेतल्या होत्या.
-त्याकाळात खन्ना हे बॅकफूटवर खेळणारे उत्कृष्ट खेळाडू होते. भारतीय संघात त्यावेळेला खूप बॅकफूटचा वापर करून खेळणारे खूप कमी फलंदाज उपलब्ध होते. आर मोहन यांनी स्पोर्ट्सस्टारमध्ये त्यांच्या या शानदार शैलीची प्रशंसा केली होती.
-प्रथम श्रेणी कारकिर्दीत त्यांनी 43.39च्या सरासरीने 5337 धावा केल्या होत्या . यात 17 शतकाचा समावेश होता. याशिवाय त्यांनी प्रथम श्रेणीत यष्टीमागे 182 झेल झेलण्याचा आणि 52 यष्टीचीत करण्याचा कामगिरीही केली होती.
-1980साली बिशन सिंग बेदी, अमरनाथ बंधू आणि मदनलाल यांच्यासह खन्ना हेही दिल्ली संघासाठी चांगली कामगिरी करणारे क्रिकेटपटू होते.
-रणजी ट्रॉफी कारकिर्दीत त्यांनी अंतिम सामन्यात सर्वोत्कृष्ट फलंदाजी प्रदर्शन केले होते. 1978-79मध्ये कर्नाटकविरुद्ध रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात त्यांनी दिल्लीकडू 2 डावात अनुक्रमे 111 आणि 128 धावा केल्या होत्या. दिल्ली संघाकडून एका सामन्यात 2 शतके करणारे ते दुसरे फलंदाज ठरले होते.
-दिल्लीने या रणजी चषकाबरोबरच पुढील 2 सालचे चषकही पटकावले होते.
-1979च्या विश्वचषकात खेळण्याचीही त्यांना संधी मिळाली होती.
-आशिया चषकातील खन्ना यांची कामगिरी उल्लेखनीय होती. त्यांनी किरमानी यांच्या ऐवजी 1984मध्ये आशिया चषकामध्ये पदार्पण केले होते. यावेळी पाकिस्तान दौऱ्यावर असताना खन्ना यांनी 69 आणि 72 धावा केल्या होत्या. यामुळे त्यांना मालिकावीर पुरस्कारही देण्यात आला होता.
-तसेच, 1985-86मध्ये जम्मू आणि काश्मिर संघाविरुद्ध खेळताना त्यांनी 115 धावा केल्या होत्या आणि यष्टीमागे त्यांनी 5 झेल घेतले होते.
-खन्ना हे निवृत्तीनंतर ऑल इंडिया रेडिओत क्रिकेट तज्ञाचे कामकाज पाहत होेते. त्यानंतर त्यांनी स्वत:ची क्रिकेट अकॅडमी सुरु केली.