भारतीय संघ (Team india) सध्या वेस्ट इंडीज संघासोबत मायदेशात एकदिवसीय मालिका आणि टी२० मालिका खेळत आहे. या मालिकेनंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मायदेशात श्रीलंका (IND vs SL) संघासोबत कसोटी मालिका खेळणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचे निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापनाने या मालिकेसाठी ४ खेळाडूंचा समावेश कसोटी संघात न करण्याचा निर्णय घेतला आहे. या ४ खेळाडूंमध्ये अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, इशांत शर्मा, वृद्धिमान साहा या खेळाडूंचा समावेश आहे. बीसीसीआयने मंगळवारी (८ फेब्रुवारी) कसोटी मालिकेमध्ये या खेळाडूंचा समावेश केला जाणार नसल्याचे म्हटले आहे.
बीसीसीआयच्या मुख्य अधिकाऱ्यांनी एका क्रिडा संकेतस्थळाला माहिती देताना म्हटले आहे की, “निवडकर्त्यांना आता नविन खेळाडूंना खेळवायचे आहे. या चार खेळाडूंना या गोष्टीची माहिती देण्यात आली आहे. हा निर्णय भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि संघ व्यवस्थापणाच्या इतर वरिष्ठ सदस्यांशी चर्चा केल्यानंतर घेण्यात आला आहे. निवडकर्त्यांना वाटते की इशांत शर्मा आणि वृद्धिमान साहा यांचा सर्वोत्तम काळ गेला आहे. आता त्यांचे वय सुद्धा झाले आहे. या दोघांनी भारतीय क्रिकेटसाठी खूप काही केले आहे आणि ते चांगले खेळाडू आहेत.”
तसेच रहाणे आणि पुजारा यांच्याबद्दल असे बोलले जात आहे की, जर त्यांनी देशांतर्गत स्पर्धेत चांगली कामगिरी केली तर संघात त्यांचे पुनरागमन होईल. रहाणे आणि पुजारा या रणजी हंगामात त्यांच्या संघांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आपापल्या संघात सामाविष्ट झाले आहेत. या दोन्ही फलंदाजांनी अलीकडच्या काळात खराब कामगिरी केली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही त्यांना देशांतर्गत स्तरावर खेळताना काही धावा करण्याचा सल्ला दिला होता.
भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे, जी २५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे आणि दुसरी कसोटी ५ मार्चपासून खेळवली जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
वेस्ट इंडिजविरुद्ध गेली १६ वर्षे भारतीय संघ राहिलाय अजेय, मोठ्या विक्रमात पाकिस्तानची केलीय बरोबरी
‘मैं फिल्ड सेट करूंगा, तो पता लागूगा’, रोहितचं कौतुक करताना पंजाब किंग्जचा राहुलला अप्रत्यक्ष टोला