भारतीय क्रिकेट संघाला येत्या ९ जूनपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात ५ सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाचे विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. दुखापतीनंतर जवळपास ७ महिन्यांनंतर अष्टपैलू हार्दिक पंड्या याची भारतीय संघात पुन्हा निवड झाली आहे. तो दिल्ली येथे होणाऱ्या पहिल्या टी२० सामन्यातून संघात पुनरागमन करू शकतो.
तत्पूर्वी द्रविड यांनी हार्दिकबद्दल वक्तव्य करताना त्याच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. हार्दिकच्या आयपीएल २०२२मधील नेतृत्त्वाचेही द्रविड यांनी कौतुक केले आहे. भारताचे संघ व्यवस्थापन सध्या अष्टपैलू हार्दिककडून सर्वोत्तम कामगिरी करून घेण्यावर भर देणार असल्याचेही द्रविड यांनी सांगितले आहे.
हार्दिकला एक दिवसाची विश्रांती दिली गेली
पंड्याने दुखापतीतून पुनरागमन करत आयपीएलच्या पंधराव्या हंगामात जबरदस्त खेळ दाखवला. त्याने आपल्या वैयक्तिक प्रदर्शनासह संघाकडून सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करून घेतले. परिणामी हार्दिकच्या नेतृत्त्वाखालील गुजरात टायटन्स संघाने पहिल्याच हंगामात विजेतेपदाला गवसणी घातली. गुजरात संघाचे नेतृत्त्व करताना अननुभवहिन हार्दिकने त्याच्या मैदानावरील निर्णयांबरोबरच शांती आणि परिपक्वताही दाखवली.
द्रविड यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, त्यांनी पत्रकार परिषदेपूर्वी हार्दिकची भेट घेतली होती आणि त्याला एक दिवस विश्रांती घेण्यास सांगितले होते. कारण तो आयपीएलच्या अंतिम सामन्याचा भाग होता. याच कारणामुळे हार्दिक भारतीय संघाच्या सराव सत्राच्या पहिल्या दिवशी नेट्समध्ये अनुपस्थित होता.
द्रविड म्हणाले की, मी काही तासांपूर्वीच हार्दिकला भेटलो होतो. आयपीएलचा अंतिम सामना सामना खेळणाऱ्या या खेळाडूला आम्ही अधिकच्या एका दिवसाची सुट्टी दिली होती.
#TeamIndia Head Coach, Rahul Dravid is excited to have someone of @hardikpandya7's quality in the side. 👍 👍#INDvSA | @Paytm pic.twitter.com/dszAELbKwy
— BCCI (@BCCI) June 7, 2022
हार्दिकबद्दल द्रविड यांचे संपूर्ण वक्तव्य
पुढे हार्दिकच्या नेतृत्त्वाचे कौतुक करताना द्रविड म्हणाले की, “हार्दिकच्या आयपीएलमधील नेतृत्त्वाने मला खूप प्रभावित केले. त्याने खूप चांगले प्रदर्शन केले. त्याचे नेतृत्त्वही चांगले होते आणि त्याचे वैयक्तिक प्रदर्शनही चांगले राहिले. नेतृत्त्व गटाचा भाग बनण्यासाठी कर्णधार असणेच आवश्यक नसते. सद्यस्थितीत आमच्यासाठी ही सकारात्मक बाब आहे की, त्याने पुन्हा गोलंदाजी सुरू केली आहे. आम्हाला माहिती आहे की, त्याची आमच्यासाठी भूमिका काय आहे आणि त्याच्या गोलंदाजीमुळे संघातील खोलीला काय मदत मिळेल.”
“आता आम्हाला हे पाहावे लागेल की, एक गोलंदाज, फलंदाज आणि क्षेत्ररक्षक म्हणून त्याच्यातील सर्वश्रेष्ठ कसे बाहेर काढू शकतो. पुढे काय होईल, हे पाहावे लागेल,” असेही द्रविड यांनी म्हटले आहे.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
इंस्टाग्रामचा कोहलीच ‘किंग’! विराटने पूर्ण केले खास द्विशतक, बनला जगातील एकमेव क्रिकेटर
विश्वचषकातील सरासरी प्रदर्शनानंतरही भारतीय क्रिकेटर टॉप-१०मध्ये कायम, स्म्रीती ‘या’ स्थानी कायम
अरेरे! आझमच्या पाकिस्तान संघावर ओढावू शकते वनडे विश्वचषक न खेळताच बाहेर होण्याची नामुष्की