भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात 4 दिवसांचा खेळ पूर्ण झाला. पण परिस्थिती अशी आहे की शेवटच्या दिवशी न्यूझीलंडला विजयासाठी 107 धावा करायच्या आहेत, तर भारताला हा सामना जिंकायचा असेल तर 10 विकेट्स घ्याव्या लागतील. अशा परिस्थितीत एका नवीन अपडेटने भारतीय चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.
वास्तविक, पाचव्या दिवसाच्या खेळाबाबत मोठे अपडेट समोर आले आहे. म्हणजे सामन्यादरम्यान पावसाची 80 टक्के शक्यता आहे. एक्युवेदरच्या हवामान रिपोर्टनुसार, रविवारी (20 ऑक्टोबर) बहुतेक ढगाळ वातावरण असेल आणि वादळाचीही शक्यता आहे. पाऊस पडण्याची 80 टक्के शक्यता आणि वादळ येण्याची 48 टक्के शक्यता आहे. भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघातील पहिल्या कसोटी सामन्याचा पाचवा दिवस पूर्णपणे वाहून जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे हा सामना अनिर्णित राहण्याची शक्यता आहे.
सरफराज खान (150) आणि रिषभ पंत (99) यांच्यातील चौथ्या विकेटसाठी 177 धावांच्या मोठ्या भागीदारीमुळे भारत एका वेळी 408/3 धावा करून न्यूझीलंडसमोर मोठे लक्ष्य ठेवण्यास सज्ज दिसत होता, परंतु त्यानंतर सामना पूर्णपणे बदलला. न्यूझीलंडने पलटवार केला. किवी गोलंदाजांनी अवघ्या 54 धावांत उर्वरित 7 विकेट्स घेतल्या आणि भारत 99.3 षटकांत 462 धावांत गडगडला. यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी 107 धावांचे माफक लक्ष्य मिळाले. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 4 चेंडू टाकले होते जेव्हा स्टंप घोषित केले.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतासाठी कसोटी सामन्यात 0 आणि 150 धावा करणारे टाॅप-3 खेळाडू, युवा स्टार खेळाडूचाही समावेश
VIDEO; पंतचा 107 मीटर लांबीचा गगनचुंबी षटकार पाहून चाहते थक्क!
IND vs NZ; खराब खेळीनंतर ‘या’ स्टार खेळाडूवर चाहते भडकले, बाहेर काढण्याची केली मागणी!






