---Advertisement---

MI vs RR: राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकला, मुंबईला दिले फलंदाजीचे आमंत्रण

---Advertisement---

आयपीएल 2025 स्पर्धेतील 50 वा सामना आज म्हणजेच 1 मे रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात खेळला जाणार आहे. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जाणार आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे तसेच मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले आहे.

मुंबई संघाने सलग पाच सामने जिंकून शानदार पुनरागमन केले आहे. तसेच मुंबई पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांचे 12 पॉईंट्स आहेत, त्यामुळे हा सामना जिंकून ते पॉइंट्स टेबलवर वरच्या स्थानावर पोहोचण्याचा प्रयत्न करतील. राजस्थान संघाने मागच्या सामन्यात शानदार पद्धतीने गुजरातचा पराभव करत सामना जिंकला होता.
राजस्थान सध्या पॉईंट्स टेबलवर आठव्या स्थानावर आहे. राजस्थान संघासाठी प्लेऑफच्या दृष्टीने हा सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. राजस्थानच्या वैभव सूर्यवंशी वर आज सगळ्यांच्या नजरा असतील. मागच्या सामन्यात त्याने जोरदार पद्धतीने शतक झळकावले होते.

दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हन:

मुंबई इंडियन्स: हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, रायन रिकल्टन, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर, कॉर्बीन बॉश, ट्रेंट बोल्ट, दीपक चाहर, जसप्रीत बुमराह.

राजस्थान रॉयल्स: रियान पराग (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, नितीश राणा, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, जोफ्रा आर्चर, महिष तीक्षणा, कार्तिकेय सिंग, फझलहक फारूकी, आकाश मधवाल.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---