---Advertisement---

पंतप्रधान मोदींनी केली भारताच्या सर्वोच्च क्रिडा पुरस्काराचे नाव बदलण्याची घोषणा, ‘हे’ असेल नवे नाव

---Advertisement---

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा भारताचा सर्वोच्च क्रिडा पुरस्कार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना दरवर्षी युवक कल्याण आणि क्रिडा मंत्रालयाकडून हा पुरस्कार दिला जातो. मात्र आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुरस्कारासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी या पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे ठेवले आहे. स्वत: मोदी यांनी सोशल मीडियाद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे.

विशेष म्हणजे, नुकतेच भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये कांस्य पदक जिंकत इतिहास रचला आहे. तसेच महिला संघानेही उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचण्याची किमया साधली होती. यानंतर मोदींनी घेतलेला हा निर्णय हॉकी क्षेत्रासाठी अभिमानाची बाब असणार आहे.

शुक्रवारी (०६ ऑगस्ट) आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्वीट करत पंतप्रधान मोदी यांनी पुरस्काराचे नवे नाव घोषित केले आहे. सोबतच त्यांनी या पुरस्काराने नाव बदलण्यामागील कारणही सांगितले आहे.

‘भारतभरातील नागरिकांकडून मला राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव माजी हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या नावावर ठेवण्यासाठी अनेक विनंत्या येत आहेत. त्यांच्या भावनांचा आदर करून मी अशी घोषणा करतो की, इथून पुढे खेलरत्न पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखला जाईल!,’ असे पंतप्रधान मोदी यांनी लिहिले आहे.

दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी, आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार आणि अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. या दिवशी दिग्गज हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा वाढदिवस असतो. त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणूनही ओळखला होता.

क्रिकेट क्षेत्राबद्दल बोलायचे झाले तर, आतापर्यंत रोहित शर्मा (२०२०), सचिन तेंडुलकर (१९९७-९८), एमएस धोनी (२००७) आणि विराट कोहली (२०१८) यांना खेलरत्न पुरस्कार मिळाला आहे. तसेच बीसीसीआयने यंदाच्या खेलरत्न पुरस्कारासाठी भारतीय संघाचा फिरकीपटू आर अश्विन आणि महिला संघाची कर्णधार मिताली राज हिची शिफारस केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

अनुभवी गोलंदाज ईशांतला नॉटिंघम कसोटीत का मिळाली नाही जागा? गंभीर कारण आले पुढे

चांगल्या सुरुवातीनंतरही रोहित अवघ्या ३६ धावांवर झेलबाद, मैदान सोडताना स्वत:वरच काढला राग

किती उत्साह म्हणायचा! पंत मैदानात उतरताच दिग्गज क्रिकेटर जोमात; म्हणाले, ‘आता फक्त हल्लाबोल’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---