पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी त्यांच्या क्रिकेट बोर्डात बुधवारी (21 डिसेंबर) मोठी बदल घडवून आणला. मागच्या एका वर्षांपासून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा कारभार पाहणारे रमीज राजा यांनी पंतप्रधानांच्या आदेशावरून हे पद सोडावे लागले. पीसीबीच्या नवीन अध्यक्षाच्या रूपात नजम सेठी यांची नियुक्ती केली गेली आहे. नजम सेठी यांनी यापूर्वी देखील पीसीबी अध्यक्षाच्या भूमिका कामकाज पाहिले आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी जेष्ठ पत्रकार नजम सेठी (Najam Sethi) यांना पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजेच पीसीबीच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यासाठी परवानगी दिली आहे. अशात मागच्या एक वर्षापासून बोर्डाच्या अध्यक्षदी विराजमान असलेले रमीझ राजा (Ramiz Raja) यांना या पदावरून पायउतार व्हावे लागणार आहे. रमीझ 2021 मध्ये पीसीबीचे अध्यक्ष बनले होते. त्यांना पुढच्या तीन वर्षांसाठी या पदावर नियुक्त केले गेले होते. मात्र कार्यकाळ पूर्ण करण्याआधीच राजांना हे पद खाली करावे लागेल आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून नवीन अध्यक्षांच्या नियुक्तीची घोषणा लवकरच केली जाईल, असेही सांगितले जात आहे.
पाकिस्तानमध्ये 2018 साली इमरान खान यांचा पक्ष सत्तेत आला. तेव्हा नजम सेठी पीसीबीचे अध्यक्ष होते, पण सत्तांतर झाल्यानंतर त्यांनी अध्यक्षपद सोडले. यापूर्वी 2013 आणि 2014 मध्ये देखील सेठी पीसीबीच्या अध्यक्षाच्या रूपात कामकाज पाहत होते. रमीज यांनी 2021 साली ही जबाबदारी स्वीकारली असून दरम्यानच्या कालता एहेसान मनी यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली. रमीझ राजा यांच्या नेतृत्वात पाकिस्तानने 1992 साली विश्वचषक जिंकला होता आणि मागच्या वर्षी त्यांना पीसीबीचे अध्यक्षपद देखील भूषवले. त्यांच्या कार्यकाळात पाकिस्तान संघाचे प्रदर्शन देखील उंचावल्याचे पाहायला मिळाले. पण या एका वर्षांत राजांच्या भोवती अनेक वाद देखील पाहायला मिळाले.
पुढच्या वर्षी म्हणजेच 2023 साली खेळला जाणारा आशिया चषक पाकिस्तानमध्ये आयोजित केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी एक सुचक विधान करत भारत आशिया चषक खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये जाणार नाही, असे म्हटले होते. याच वक्तव्यानंतर राजा देखील चांगलेच संतापले आणि बीसीसीआयस आयसीसीला चेतावणीच दिली. राजा म्हणाले होते की, भारत आशिया चषकासाठी पाकिस्तानमध्ये येत नसेल, तर पाकिस्तान देखील आगामी वनडे विश्वचषकासाठी भारताचा दौरा करणार नाही. पुढच्या वर्षीचा विश्वचषक भारतात खेळला जाणार असल्यामुळे राजांनी हे वक्तव्य केले, होते. पण अशात आता त्यांना स्वतःचे अध्यक्षपद गमवावे लागल्यामुळे पीसीबी आणि बीसीसीआयमधील हा वाद पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. (Rameez Raj has been ousted as the PCB chairman and Najam Sethi has become new chairman of board.)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘शतकवीर’ पुजारा-गिलला कसोटी क्रमवारीत जबरदस्त फायदा, कुलदीपनेही घेतली 19 स्थानांची उडी
ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू वेडचे चालू सामन्यात लाजीरवाणे कृत्य, चारचौघात मागावी लागली माफी