२००६ ते २०११ पर्यंतच्या भारतीय संघाच्या (TEAM INDIA) महान गोलंदाजांपैकी एक वेगवान गोलंदाज एस श्रीसंतने(s sreesanth) रणजी ट्रॉफीद्वारे(ranji trophy 2022) प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. रणजी ट्रॉफी २०२२ मध्ये केरळच्या संघात त्याचा समावेश करण्यात आला आहे. रणजी ट्रॉफीचा चालू हंगाम गुरुवारपासून(१७ फेब्रुवारी) सुरू झाला, जी देशांतर्गत स्पर्धा कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून होऊ शकली नव्हती. मेघालयविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनचा भाग बनवण्यात आले आहे. श्रीसंतने पहिल्या दिवशी दोन विकेट घेत आपली निवड योग्य असल्याचे सिद्ध केले आहे.
रणजी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मेघालयचा संपूर्ण संघ केवळ १४८ धावांत सर्वबाद झाला. केरळकडून गोलंदाजी करणाऱ्या श्रीसंतला सुरुवातीच्या विकेट्स मिळाल्या नसल्या तरी शेवटी फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. शेवटच्या षटकात आर्यन बरोरा आणि चेंगकम संगमा यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवून श्रीसंतने मेघालयचा डाव संपवला. श्रीसंतने पहिल्या दिवशी ११.५ षटके टाकली. मेघालायविरुद्ध त्याने ४० धावा देत २ बळी घेतले.
श्रीसंतने शेवटचा लाल चेंडू क्रिकेट सामना २०१३ मध्ये मुंबई विरुद्ध शेष भारताकडून खेळला होता. या सामन्यात श्रीसंतला एक विकेट मिळाली होती. आता ९ वर्षांनंतर त्याला प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली आहे.
या सामन्यात केरळचा कर्णधार सचिन बेबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीसंतने पहिल्याच दिवशी मेघालय संघाच्या २ फलंदाजांना बाद केले. त्याने ११.५ षटकात ४० धावा देत २ बळी घेतले. त्याच्या पुनरागमनाने अनेक चाहते आनंदी आणि भावूकही झाले आहेत. आयपीएल २०२१ च्या मेगा लिलावात कोणीही खरेदीदार न मिळाल्यानंतर त्याचे हे प्रदर्शन कौतुकास्पद आहे. निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्याला कामगिरीत सातत्य ठेवावे लागेल. श्रीसंतने भारतासाठी २७ कसोटी, ५३ एकदिवसीय आणि १० टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. २०११ मध्ये स्पॉट फिक्सिंगच्या आरोपानंतर त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती.
दरम्यान श्रीसंतने २५ ऑक्टोबर २००५ रोजी श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. शेवटचा सामना तेव्हा त्याने ऑगस्ट २०११ मध्ये ओवलमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळून १० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. श्रीसंतने भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण १६९ विकेट घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
दुसऱ्या टी२०पूर्वी विंडीजचे खेळाडू आणि पंच मैदानावर बसले गुडघे टेकून, पण भारतीय खेळाडू मात्र…
गुजरात जायंट्सचा महत्त्वपूर्ण विजय, तमिळ थलाईव्हाजला हरवत जिवंत ठेवले प्लेऑफमधील आव्हान
विराट, रिषभच्या अर्धशतकांच्या जोरावर दुसऱ्या टी२०त भारताचा ८ धावांनी विजय, मालिकाही खिशात