---Advertisement---

Ranji Trophy Final : धवल कुलकर्णीचा क्रिकेटला रामराम, अन् मुंबईकडून अविस्मरणीय निरोप

---Advertisement---

मुंबई क्रिकेट टीमने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात इतिहास घडवला असून मुंबईने रणजी ट्रॉफी जिंकली आहे. मुंबईने अंतिम सामन्यात विदर्भावर 169 धावांनी धमाकेदार विजय मिळवला आहे. तसेच मुंबईने मुंबईने 8 वर्षांचा दुष्काळ संपला, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई संघ 2024 च्या रणजी ट्रॉफी फायनलमध्ये विदर्भाचा पराभव करून 42 व्यांदा चॅम्पियन बनला. यापूर्वी ती 2015-16 मध्ये चॅम्पियन बनली होती. मुंबईचा संघ 48 व्यांदा रणजी फायनलमध्ये पोहोचला होता. तर विदर्भाने तीनदा अंतिम फेरी गाठली होती. 

याबरोबरच, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली या रणजी मोसमात मैदानात उतरलेल्या मुंबई संघाने उत्कृष्ट कामगिरी केली होती, ज्यात त्यांनी 7 पैकी 5 सामने जिंकले होते, तर एक सामना अनिर्णित राहिला होता. तर एकात पराभवाला सामोरे जावे लागले होते. यानंतर बडोदाविरुद्धचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना अनिर्णित राहिला तेव्हा पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मुंबई संघ उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित करण्यात यशस्वी ठरला होता.

अशातच धवल कुलकर्णी याने आधीच रणजी ट्रॉफी फायनल आपला अखेरचा सामना असल्याचं जाहीर केलं होतं. धवलने या महाअंतिम सामन्यात एकूण 4 विकेट्स घेतल्या. धवलने पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 1 विकेट घेतली. धवलने पहिल्या डावात विदर्भाच्या अथर्व तायडे, अमन मोखाडे आणि करुण नायर या टॉप ऑर्डरमधील फलंदाजांना आऊट केलं. तर दुसऱ्या डावात उमेश यादव याला आऊट केलं आहे.

यानंतर मुंबईच्या खेळाडूंनी रणजी ट्रॉफी जिंकल्यानंतर एकच जल्लोष केला. यावेळेस कॅप्टन अजिंक्य रहाणे याच्यासह इतर खेळाडूंनी त्याचं अभिनंदन केलं. तसेच स्टेडियममध्ये उपस्थित क्रिकेट चाहत्यांनी त्याला स्टँडिग ओवेशन दिलं आहे. तसेच धवल कुलकर्णी याने 95 सामन्यांमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व केलं आहे. तर धवलने या 157 डावांमध्ये 281 विकेट्स घेतल्या. धवलने 15 वेळा 5 विकेट्स घेतल्या. तसेच 1 वेळा 10 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. तसेच धवलने 110 डावात 8 अर्धशतकांसह 1 हजार 793 धावा केल्या. धवलची 87 ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.

दरम्यान, मुंबईसाठी या रणजी मोसमात सर्वाधिक धावा भूपेन लालवानीच्या बॅटतून आल्या, ज्याने 10 सामन्यांत 39.2 च्या सरासरीने 588 धावा केल्या. मोहित अवस्थीने संघाकडून सर्वाधिक विकेट घेतल्या, ज्याने 8 सामन्यात 35 विकेट्स घेतल्या आहेत.

मुंबई प्लेईंग ईलेव्हन | अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, भूपेन लालवानी, मुशीर खान, श्रेयस अय्यर, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शम्स मुलाणी, शार्दूल ठाकुर, तनुष कोटियन, धवल कुलकर्णी आणि तुषार देशपांडे.

विदर्भ प्लेईंग ईलेव्हन | अक्षय वाडकर (कॅप्टन आणि विकेटकीपर), अथर्व तायडे, ध्रुव शौरे, अमन मोखाडे, करुण नायर, यश राठोड, आदित्य सरवटे, उमेश यादव, हर्ष दुबे, यश ठाकुर आणि आदित्य ठाकरे.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---