लीड्स। आज(6 जूलै) 2019 विश्वचषकात भारत विरुद्ध श्रीलंका संघात 44 वा सामना सुरु आहे. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी भारताने 11 जणांच्या संघात 2 बदल केले आहेत. आज युजवेंद्र चहलला विश्रांती दिली असून कुलदीप यादवला संधी देण्यात आली आहे. तसेच मोहम्मद शमी ऐवजी आज रविंद्र जडेजाला संधी मिळाली आहे. जडेजाचा हा या विश्वचषकातील पहिला सामना आहे.
त्यामुळे 2019 विश्वचषकात भारताकडून खेळणारा जडेजा 16 वा खेळाडू ठरला आहे. एका विश्वचषकात भारताकडून 16 खेळाडूंनी खेळण्याची पहिलीच वेळ आहे. यापूर्वी 2011मध्ये भारताकडून 15 खेळाडूंनी एकतरी सामना खेळला होता.
2019 च्या विश्वचषकात भारताकडून विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, विजय शंकर, रिषभ पंत, एमएस धोनी, केदार जाधव, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, दिनेश कार्तिक आणि रविंद्र जडेजा हे 16 खेळाडू एकतरी सामना खेळले आहेत.
तसेच विजय शंकर दुखापतग्रस्त होऊन विश्वचषकातून बाहेर पडल्याने त्याच्या ऐवजी संधी मिळालेल्या मयंक अगरवालला अजून 11 जणांमध्ये संधी मिळालेली नाही. जर त्याला पुढे या विश्वचषकातील भारताच्या सामन्य़ांत 11 जणांच्या संघात संधी मिळाली तर तो 2019 विश्वचषकात भारताकडून खेळणारा 17 वा खेळाडू ठरु शकतो.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–टीम इंडियाची सुपरफॅन आजी आज पून्हा मैदानात!
–धोनीने मौन सोडले; निवृत्तीबद्दल केले मोठे भाष्य
–श्रीलंकाविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाने केले दोन बदल, या खेळाडूंना मिळाली संधी