आयपीएलच्या इतिहासात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चौथ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. 2009 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली होती पण त्यांना डेक्कन चार्जर्सकडून पराभव स्वीकारावा लागला. डेक्कनने हा सामना 6 धावांनी जिंकला. 2011 मध्ये संघ चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पराभूत झाला. चेन्नईने हा सामना 58 धावांनी जिंकला. 2016 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ उत्तम फॉर्ममध्ये होता पण सनरायझर्स हैदराबाद 8 धावांनी रोमांचक सामना जिंकून पहिल्यांदाच चॅम्पियन बनला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे, जिथे ते पंजाब किंग्ज, गुजरात टायटन्स किंवा मुंबई इंडियन्सशी सामना करू शकतात. मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील एलिमिनेटर सामना 30 मे रोजी मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंह क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना जिंकणारा संघ दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पंजाब किंग्जशी सामना करेल. त्यानंतर जो संघ हा सामना जिंकेल तो अंतिम फेरीत बंगळुरूविरुद्ध खेळेल.
लीग स्टेजमध्ये बंगळुरूने मुंबई इंडियन्सचा 12 धावांनी पराभव केला, जरी संघाला गुजरात टायटन्सविरुद्ध 8 विकेटने पराभव स्वीकारावा लागला होता, तर संघाने चालू हंगामात दोनदा पंजाब किंग्जचा पराभव केला आहे आणि एकदा पराभव पत्करावा लागला आहे, त्यामुळे बंगळुरूला गुजरातकडून सर्वात मोठा धोका असेल.
आयपीएल प्लेऑफमध्ये चेंडू शिल्लक असताना (60 चेंडू) हा सर्वात मोठा विजय आहे. अशाप्रकारे, आरसीबीने चौथ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. 2016 नंतरचा हा त्यांचा पहिलाच अंतिम सामना असेल. आरसीबीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि गोलंदाजांनी परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेत पंजाब किंग्जला 14.1 षटकांत फक्त 101 धावांत गुंडाळले.
त्यानंतर सॉल्टने विराट कोहली (12) सोबत पहिल्या विकेटसाठी 20 चेंडूत 30 धावा आणि मयंक अग्रवाल (19) सोबत दुसऱ्या विकेटसाठी 27 चेंडूत 54 धावा जोडून आरसीबीला 10 षटकांत दोन विकेटने 106 धावा करून सहज विजय मिळवून दिला.






