ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी20 सामन्यात रिंकू सिंगने चांगली फलंदाजी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. तेव्हापासून त्याचे खूप कौतुक होत आहे. तर माजी क्रिकेटपटू अभिषेक नायरने रिंकू सिंगची तुलना दिग्गजांशी केली आहे. त्याच्या मते, एमएस धोनी आणि हार्दिक पांड्यानंतर रिंकू सिंग हा भारताचा नवा फिनिशर आहे.
विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी20 सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा दोन विकेट्स राखून रोमहर्षक पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने निर्धारित 20 षटकात 3 विकेट्स गमावून 208 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 19.5 षटकांत 8 विकेट्स गमावून हे लक्ष्य गाठले. या सामन्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने जबरदस्त खेळी खेळली त्याने 42 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 80 धावा केल्या. मात्र, संघाच्या विजयात रिंकू सिंग (Rinku Singh) याचे योगदान महत्त्वाचे ठरले, ज्याने खालच्या फळीत येऊन 14 चेंडूत 22 धावांची धुंवाधार खेळी केली.
अभिषेक नायर (Abhishek Nair) याने रिंकू सिंगच्या या खेळीचे खूप कौतुक केले. सामना संपल्यानंतर बोलताना तो म्हणाला, “रिंकू सिंगने देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्येही ही कामगिरी केली आहे. त्याने तिसऱ्यांदा भारतीय संघाला अशा प्रकारे सामना जिंकून दिला आहे. भारतीय संघाला त्याच्याकडून एका खास खेळीची गरज होती आणि त्याने ती करून दाखवली. तो 5-7 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही पण त्याची परिपक्वता खूप जास्त आहे. यावरून त्याला फिनिशिंगमध्ये नैपुण्य असल्याचे दिसून येते. हे सोपे नाही आणि हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) याने आमच्यासाठी ते केले आहे. मात्र, यानंतर फिनिशरची भूमिका चांगल्या प्रकारे निभावू शकेल असा कोणताही पर्याय आमच्याकडे नव्हता. ते काम आता रिंकू सिंग करत आहे.”
भारताचा ऑस्ट्रेलियाविरूद्ध पुढील सामना 26 नोव्हेंबरला तिरूवनंतपुरम येथे होणार आहे. (Rinku Singh after Hardik Pandya and Dhoni legend big statement about Rinku after spectacular performance)
म्हत्वाच्या बातम्या
“मला माही भाईने सांगितले होते…”, नवा फिनिशर रिंकूने दिले धोनीला क्रेडिट
World Cup Final मध्ये ऑस्ट्रेलियाने केलेल्या हुशारीचा अश्विनकडून खुलासा, म्हणाला, “त्यांनी आयपीएल…”