भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ३ सामन्यांची कसोटी मालिका १-२ ने गमावली आणि त्यानंतर शनिवारी (१५ जानेवारी) भारताचा महान फलंदाज विराट कोहली (Viart Kohli)ने कसोटी क्रिकेटच्या कर्णधारपदावरुन पायउतार (Virat Kohli Resigns) होण्याची घोषणा केली. कोहलीच्या या निर्णयामुळे सगळेच चकित झाले आहेत. काही दिवसांपुर्वीच कोहलीने टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांचे कर्णधारपदसुद्धा सोडले होते.
चार महिन्यांच्या कालावधीत कोहलीने तिन्ही फॅारमॅटमधील कर्णधारपदे सोडली आहेत. सध्या कोहली कोणत्याच फॅारमॅटमध्ये संघाचा कर्णधार नाही. कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर भारतीय कसोटी संघाचा पुढचा कर्णधार कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातच भारताचे माजी कर्णधार सुनिल गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी कर्णधारपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या रोहित शर्मा (Rohit Sharma) नव्हे तर रिषभ पंत (Rishabh Pant)चे नाव सुचवले आहे.
व्हिडिओ पाहा- विराटने कसोटीकर्णधारपद सोडताना का घेतले धोनी-शास्त्रीचं नाव।
एका वृत्तवाहिनीशी बोलताना गावस्कर म्हणाले की, “२४ वर्षीय रिषभ पंतने मला प्रभावित केले आहे आणि त्याच्याकडे भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोपवले पाहिजे.” गावस्कर मन्सूर अली खान पतौडी यांचे उदाहरण देत पंतला कर्णधारपद देण्याबाबत बोलले आहेत. गावस्कर म्हणाले की, “पतौडीला खुप कमी वयात कर्णधारपद दिले होते आणि त्याने खुप यश मिळवले होते, तसेच पंतसुद्धा करु शकतो.”
पूढे गावस्कर म्हणाले, “तुम्ही मला विचाराल तर मी पंतला भारतीय संघाचा पुढचा कर्णधार बनवू इच्छितो. कारण रिकी पाँटिंगच्या जागी रोहित शर्माला मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवल्यानंतर रोहितच्या फलंदाजीत काय बदल झाला? हे तर आपण सर्वांनीचं पाहिले आहे. कर्णधार झाल्यानंतर त्याला जबाबदारीची जाणीव झाली, त्याने ३०, ४० आणि ५०धावांचे डाव १००, १५० आणि २०० मध्ये बदलण्यास सुरुवात केली.”
हेही वाचा- कोहलीच्या निर्णयावर कुटुंबातून आली प्रतिक्रिया; भाऊ, बहिण म्हणाले, ‘आम्ही सदैव तुझ्या पाठिशी’
कोहलीने शनिवारी सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर करत कर्णधारपद सोडत असल्याचे जाहीर केले आहे. मागील ८ वर्षांपासुन कोहली भारतीय संघाचा कर्णधार असून त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कसोटी फॅारमॅटमध्ये अनेक टप्पे गाठले. दुसरीकडे आत्तापर्यंत पंतने कधीही वरिष्ठ राष्ट्रीय संघाचे कर्णधारपद भुषवलेले नाही. पण गावस्करांना खात्री आहे की निवडकर्ते पंतला कर्णधारपद देण्याबाबत विचार करतील.
२०१४-१५ च्या मध्यात धोनीनंतर कोहलीची कसोटी संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कसोटीमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला. त्याचवेळी, त्याने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
महत्त्वाच्या बातम्या-
कोहलीच्या निर्णयावर कुटुंबातून आली प्रतिक्रिया; भाऊ, बहिण म्हणाले, ‘आम्ही सदैव तुझ्या पाठिशी’
“त्याचे चेंडू म्हणजे बंदुकीच्या गोळ्या”; ‘उस्मानाबाद एक्सप्रेस’ राजवर्धनचा फॅन बनला किवी दिग्गज
नाट्यमयरित्या टाय झाला तमिल-जयपूर सामना; मनजीतची तांत्रिक चूक
हेही पाहा-