भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर जाण्यासाठी सज्ज झाला आहे. संपूर्ण संघ सध्या मुंबईमध्ये क्वारंटाईन असून, २ जून रोजी ते इंग्लंडला रवाना होतील. भारत या दौऱ्यावर प्रथमता १८ ते २२ जून दरम्यान जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना व इंग्लंड विरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. तत्पूर्वी, भारतीय संघाचा यष्टीरक्षक रिषभ पंत याच्यावर अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. नुकतेच त्याच्या लहानपणीच्या प्रशिक्षकांनी त्याच याबाबतची एक घटना उघड केली असून, यातून पंतची हळवी बाजू समोर आली.
रिषभ माझ्याकडे माफी मागायला आला
सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवत असलेल्या रिषभला लहानपणी क्रिकेटचे धडे देणाऱ्या तारक सिन्हा यांनी रिषभबद्दलची एक घटना सांगितली आहे.
ते म्हणाले, “रिषभ रूडकी येथून ज्या वेळी दिल्लीत आला, त्यावेळी त्याने प्रथम माझ्याच दक्षिण दिल्लीतील सोनेट अकादमीत प्रशिक्षणाला सुरुवात केली. तो लहानपणापासून प्रतिभावान होता. एकदा नेटमध्ये खराब फलंदाजी केल्यामुळे मी त्याच्यावर खूप नाराज झालो. त्याने ही बाब ओळखली होती. त्या दिवशी तो रात्रभर झोपू शकला नाही. तो रात्री साडेतीन वाजता माझ्या घरी आला व माझी माफी मागितली. त्यावेळी मी वैशाली येथे राहत तर तो एनसीआरमध्ये राहायचा. तो एक तासाचा प्रवास करून माझ्याकडे आला होता.”
क्रिकेटमध्ये कारकीर्द करण्यासाठी रिषभ पंत उत्तराखंड येथील रूडकी येथून दिल्लीमध्ये स्थायिक झाला होता.
नेतृत्वाबद्दल बोलणे घाईचे ठरेल
तारक सिन्हा यांनी रिषभ पंतला भारतीय संघाचा पुढील कर्णधार करणे याविषयी बोलताना म्हटले, “त्याच्याकडे नेतृत्वगुण आहेत. मात्र, इतक्यात त्याला कर्णधार करणे किंवा त्याला भविष्यातील कर्णधार ठरवणे घाईचे ठरेल. आयपीएलमध्ये त्याने ज्याप्रकारे दिल्लीचे नेतृत्व केले ते पाहून आनंद झाला.”
रिषभ पंतने आपल्या नेतृत्वाला आयपीएल २०२१ हंगाम स्थगित होईपर्यंत गुणतालिकेत अव्वलस्थानी पोचवले होते. त्यानंतर अनेकांनी त्याच्या नेतृत्वाचे कौतुक केले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
तो मुलगा नक्की कोण? धोनीच्या व्हायरल झालेल्या जून्या फोटोवर चाहत्यांना पडला प्रश्न
पंत-धोनीच्या तुलनेचे सत्र सुरूच; बालपणीचे प्रशिक्षक संतापून म्हणाले, ‘सतत त्यांची तुलना कशाला?’
बिग ब्रेकिंग! आयपीएल २०२१चे राहिलेले सामने होणार ‘या’ देशात, बीसीसीआयने शनिवारी घेतला निर्णय