आयपीएल 2023च्या तयारीला वेग आला असून खेळाडू करारबद्ध आणि करारमुक्त करण्याचे सत्र सुरू आहे. करारमुक्त झालेल्या खेळाडूंन डिसेंबर महिन्यात होणाऱ्या आयपीएलच्या लिलावात सहभागी होता येणार आहे. त्याचबरोबर भारतात विजय हजारे ट्रॉफी देखील सुरू आहे. आयपीएलमधून जे खेळाडू करारमुक्त झाले, त्यातील काही खेळाडू या स्पर्धेत चांगले प्रदर्शन करत आहेत. त्यामुळे ते संघ नक्कीच पश्चाताप करत असतील. पण असेही काही संघ आहेत ज्यांनी खेळाडूंना करारबद्ध केले आणि ते खेळाडू आता विजय हजारे ट्रॉफीमध्ये धमाकेदार प्रदर्शन करत आहेत.
आयपीएलमध्ये रियान पराग (Riyan Parag) मैदानावर चुकीच्या वर्तनामुळे चर्चेचा भाग झालेला. मागच्या हंगामात राजस्थान रॉयल्स या संघाकडून खेळताना त्याने चांगले प्रदर्शन केलेले. त्यामुळे त्याला या हंगामात देखील राजस्थान रॉयल्सने संघात स्थान दिले. पण त्यांचा हा निर्णय संघासाठी चांगला ठरत आहे. रीयान पराग याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये एकाच आठवड्यात दोन शतके लगावली आहेत. रियान हा आसामचा असून स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये आसाम संघामध्ये त्याची महत्वाची भुमिका आहे.
सध्या सुरु असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये सिक्कीम विरुद्ध आसाम हा सामना खेळला गेला. आसामने प्रथम फलंदाजी करत 50 षटकांमध्ये 8गडी गमावत 307 धावांचा डोंगर उभा केला.ही धावसंख्या उभारताना रियानने सिंहाचा वाटा उचलला. या सामन्यात रियानने 93 चेंडूत 5 चौकार आणि 7 उत्तुंग षटकारांच्या मदतीने 128 धावा केल्या.याबरोबरच रियानचे प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 2 शतके झाली आहेत. या आधीचे शतक त्याने राजस्थान संघाविरुद्ध झळकावले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
प्रीमियर लीगसह FSDLची भागीदारी भारतीय फुटबॉलमध्ये भरीव सुधारणा करू शकते – प्रीमियर लीगचा दिग्गज खेळाडू पॉल डिकोव्ह
बांगलादेशविरुद्धच्या मालिकेआधी बीसीसीआयने आखली नवी योजना; ‘त्या’दोघांना मिळू शकते जबाबदारी