भारतीय संघाने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्या हंगामात अंतिम फेरी गाठली होती. विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. दुसऱ्या हंगामातील सामने अजून सुरु आहेत. रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या क्रमवारीत चौथ्या स्थानावर आहे. जर भारतीय संघाला अंतिम सामना खेळायचा असेल तर भारताला उरलेल्या 6 सामन्यापैकी 5 सामने जिंकावे लागतील. भारतीय संंघाला बांगलादेश विरुद्ध 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. तर त्यानंतर फेब्रुवारी-मार्च दरम्यान ऑस्ट्रेलिया विरुद्ध 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. भारतासाठी या दोन्ही मालिका अत्यंत महत्वाच्या असणार आहेत.
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सध्या ऑस्ट्रेलिया संघ अव्वल स्थानी आहे. त्यांचे 75 टक्के गुण आहेत. ऑस्ट्रेलिया संघानेे आतापर्यंत 8 सामने जिंकले तर एका सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आणि 3 सामने अनि्र्णित राहिले. दक्षिण आफ्रिकेचा संघ 60 टक्के गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी 6 सामने जिंकले आहेत, तर 4 सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 3 सामन्यांची मालिका 17 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. यजमान ऑस्ट्रेलिया संघ ही मालिका जिंकून अंतिम सामन्यात जागा पक्की करण्याचा प्रयत्न करेल.
भारत सध्या चौथ्या क्रमांकावर
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंका संघ आहे. त्यांचे 53.33 टक्के गुण आहेत. त्यांनी 5 सामने जिंकले आहेत आणि 4 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला तर एक सामना अनिर्णित राहिला. सध्या भारतीय संघ 52.08 टक्के गुणांसोबत चौथ्या स्थानावर आहे. त्यांनी 6 सामने जिंकले असून 4 पराभव स्वीकारावा लागला आहे तर दोन सामने अनिर्णित राहिले. पाकिस्तानला हरवून इंंग्लंड संघ 5व्या क्रमांकावर आला असून पाकिस्तान 6व्या क्रमांकावर आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तान WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर! तर टीम इंडियालाही करावी लागणार कसरत
रहाणेसह ‘या’ तीन खेळाडूंना बीसीसीआय करणार करारमुक्त! ‘या’ तिघांना मिळणार बढती