2024 च्या टी20 विश्वचषकात भारताचा कर्णधार कोण असेल हा सध्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे. रोहित शर्मा याने 2022 च्या टी20 विश्वचषकानंतर भारतासाठी एकही टी20 सामना खेळलेला नाही, तर त्याच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करणारा हार्दिक पंड्या देखील सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत हार्दिक पंड्याला घोट्याला दुखापत झाली होती. त्याच्या दुखापतीमुळे, सूर्यकुमार यादव याला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कर्णधारपदाची संधी मिळाली, परंतु दुर्दैवाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील शेवटच्या टी20 दरम्यान तोही जखमी झाला.
सध्या कर्णधारपदाच्या शर्यतीत रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यांची नावे आघाडीवर आहेत. अशा परिस्थितीत माजी भारतीय क्रिकेटर आणि सध्याचे समालोचक आकाश चोप्रा (Aakash Chopra) यांनी सांगितले आहे की, हार्दिक पंड्या आणि रोहित शर्मा पैकी कोण टी20 विश्वचषक 2024 मध्ये भारताची धुरा सांभाळू शकतो.
आकाश चोप्राचा विश्वास आहे की, हार्दिक पंड्याला त्याच्या फिटनेसच्या समस्येमुळे या वर्षाच्या अखेरीस टी20 विश्वचषकासाठी भारतीय कर्णधार म्हणून नियुक्त केले जाण्याची शक्यता नाही. आकाश चोप्रा त्याच्या यूट्यूब चॅनेलवर म्हणाला, “हार्दिक कदाचित कर्णधार होणार नाही कारण त्याचा फिटनेस हा एक मुद्दा आहे. तो सध्या खेळत नाही. विश्वचषकात त्याने त्याच्या घोट्याला दुखापत करून घेतली. तो अफगाणिस्तान मालिका खेळत नाही आणि कोणत्याही परिस्थितीत तो कसोटी खेळत नाही, त्यामुळे तो थेट आयपीएल खेळेल. हे सर्व त्याच्या विरोधात जात आहे.”
रोहित शर्मा टी20 चा कर्णधार होणार असून तो विश्वचषकामध्ये संघाचे नेतृत्व करेल, असा विश्वास माजी भारतीय क्रिकेटपटूने व्यक्त केला. याशिवाय, 2024 च्या टी20 विश्वचषकाचा संघ 2023 च्या विश्वचषकासारखाच असेल, असेही तो म्हणाला.
आकाश चोप्रा पुढे म्हणाला, “मला वाटते की, रोहित शर्मा टी20 कर्णधार होणार आहे. रोहित शर्मा 2024 मध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकातही कर्णधार असेल. हा प्रश्न जर तुम्ही मागच्या विश्वचषकानंतर विचारला असता, जर हा प्रश्न मागील विश्वचषकानंतर विचारला असता, 2022 मध्ये स्पर्धा झाली होती 2023 मध्ये नाही. 2022 नंतर विचारला असता, तर ते नसतील हे निश्चित. संघाने ज्या प्रकारे कामगिरी केली आहे त्यावर. पहिल्या 10 षटकात आम्ही 60 धावा केल्या होत्या. आमची खेळण्याची पद्धत बदलण्याबद्दल आम्ही खूप बोललो, खरे सांगायचे तर आम्ही काहीही बदलू शकलो नाही. पहिल्या 6 षटकांत आमची सरासरी धावसंख्या 36 होती, 10 षटकांत ती 60 होती. केएल राहुल, रोहित शर्मा आणि विराट कोहली आमचे पहिले तीन फलंदाज असायचे.” (Rohit or Hardik who will captain India in 2024 T20 World Cup Akash Chopra said)
हेही वाचा
‘सगळेच दारू पितात, माझी फक्त बदनामी झाली’, प्रवीण कुमारने माजी क्रिकेटपटूंवर लावले गंभीर आरोप
‘या फॉर्मेटसाठी तो लायक नाही…,’ 12 वर्षांपूर्वी माजी दिग्गजाने विराटबद्दल केलं होतं ट्वीट, आता मात्र वेगळंच काही बोलतोय