---Advertisement---

रोहित अन् विराटची यारी, जगात भारी! भारतीय कर्णधाराने पुन्हा एकदा केली किंग कोहलीची पाठराखण

On: शुक्रवार, जुलै 15, 2022 9:20 AM
Rohit-Sharma-And-Virat-Kohli
---Advertisement---

लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने भारतावर १०० धावांनी विजय मिळवत ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. या सामन्यात भारताला २४७ धावांचे लक्ष्य मिळाले होते. याचा पाठलाग करताना टीम इंडिया पूर्ण ५० षटकेही खेळू शकली नाही आणि ३८ षटकांत १४६ धावांत आटोपली. पुन्हा एकदा विराट कोहलीने चांगली सुरुवात केली. पण, मोठी खेळी खेळताना तो हुकला. त्यानंतर त्याने जुनी चूक पुन्हा केली आणि चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर मारला आणि विकेटच्या मागे झेलबाद झाला. गेल्या काही वर्षांत कोहलीचा फॉर्म राष्ट्रीय चर्चेचा विषय बनला आहे. कपिल देवसारख्या दिग्गजांनी त्याला संघातून वगळण्याचा विचार सुरू केला आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कोहली ज्याप्रकारे बाद झाला, त्यावरून हा वाद आणखी वाढणार आहे. मात्र, चार दिवसांत दुसऱ्यांदा कर्णधार रोहित शर्मा त्याच्या बचावासाठी आला आहे.

इंग्लंडविरुद्धची दुसरी वनडे हरल्यानंतर रोहित शर्माला पत्रकार परिषदेत विराट कोहलीच्या खराब फॉर्मबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा तो म्हणाला, या गोष्टी का घडत आहेत. मला कळत नाही. “तो (कोहली) अनेक सामने खेळला आहे. इतकी वर्षे तो खेळत आहे. तो इतका महान फलंदाज आहे, त्याला कोणत्याही आश्वासनाची गरज नाही. मागच्या पत्रकार परिषदेतही मी हेच बोललो होतो. फॉर्म येतो आणि जातो, हा कोणत्याही क्रिकेटरच्या करिअरचा भाग असतो. त्यामुळे इतकी वर्षे खेळणाऱ्या, इतक्या धावा करणाऱ्या कोहलीसारख्या खेळाडूने सामने जिंकले. त्याला फक्त एक किंवा दोन चांगल्या खेळींची गरज आहे, ही माझी विचारसरणी आहे आणि मला खात्री आहे की जे क्रिकेट फॉलो करतात त्यांची मानसिकता सारखीच आहे.

रोहितने ४ दिवसांत दुसऱ्यांदा कोहलीचा बचाव केला
इंग्लंड दौऱ्यातील मर्यादित षटकांच्या मालिकेत कर्णधार रोहित शर्माने विराटचा उघडपणे बचाव करण्याची ही दुसरी वेळ आहे. मात्र, विराट सध्या वाईट टप्प्यातून जात असल्याची कबुलीही रोहितने दिली. पण, भारतीय संघ व्यवस्थापनाचा अजूनही त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. रोहित म्हणाला, “आम्ही या विषयावर बोलतो. तथापि, या विषयावर बोलण्यापूर्वी, आपण देखील थोडा विचार केला पाहिजे. आपण पाहिलं आहे की सर्वच खेळाडूंची कामगिरी वर-खाली होत असते, पण खेळाडूचा दर्जा कधीच खराब होत नाही. याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. त्याने (कोहली) इतक्या धावा केल्या आहेत, त्याची सरासरी बघा, त्याने किती शतके केली आहेत, त्याला तसे करण्याचा अनुभव आहे. प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात वाईट टप्पा येतो, तो वैयक्तिक आयुष्यातही येतो.

दरम्यान, इंग्लंड आणि भारत या दोन संघात सुरू असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकत सध्या दोन्ही संघ १-१ च्या बरोबरीवर आहेत. या मालिलकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना रविवार दिनांक १७ जुलै रोजी खेळलवला जाणार आहे. या सामन्यात दोन्ही संघ मालिका काबीज करण्याच्या होतूने मैदानात उतरतील. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात तरी आता कोहलीची बॅट चमकावी अशसी आशा व्यक्त केली जात आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

पाकिस्तानचा कर्णधार कोहलीसाठी मध्यरात्री धावला; ट्वीट करत म्हणाला, ‘हा काळही…’

इंग्लंडच्या गोलंदाजाने भारतीय फलंदाजांना भरलंय ‘टोपली’त, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचे पुनरागमन

इशान किशन धापकन तोंडावर आपटला, पण खेळाडू सांत्वना द्यायची सोडून हसत बसले! Video

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---