टी20 विश्वचषक 2022मधील भारतीय संघाचा दुसरा सामना गुरुवारी (दि. 27 ऑक्टोबर) नेदरलँड्सविरुद्ध झाला. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने 56 धावांनी शानदार विजय मिळवला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी नेदरलँड्सच्या गोलंदाजांना चोप देत समाधानकारक धावसंख्या उभारली आणि क्षेत्ररक्षणावेळी याच धावसंख्येचा बचावही केला. यादरम्यान भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने खास कारनामा करून दाखवला. त्याने या खेळी दरम्यान भारताकडून टी20 विश्वचषकात सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज होण्याचा मान मिळवला. त्यानंतर आता युवराज सिंगबाबत एक महत्त्वाचे विधान आहे.
नेदरलँड्सविरुद्ध भारताने फलंदाजी करताना 2 विकेट्स गमावत 179 धावा चोपल्या. या धावा करताना भारताकडून रोहितने डावातील पहिले अर्धशतक साजरे केले. त्याने 39 चेंडूत 53 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 3 षटकार आणि 4 चौकारही मारले. यासह त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. या तीन षटकारांसह त्याच्या नावे टी20 विश्वचषकात 34 षटकार झाले. त्याने 33 षटकार ठोकणाऱ्या युवराजला मागे टाकले.
सामन्यानंतर रोहितला या विक्रमाची जाणीव करून दिली गेली. तुला हा विक्रम मोडून कसे वाटते आहे हा प्रश्न त्याला विचारला गेला. त्यावर रोहित हसून म्हणाला,
“युवराज हे ऐकून नक्कीच खुश नसेल”
रोहित शर्मा व युवराज सिंग या दोघांनीही 2007 टी20 विश्वचषकावेळी आपला पहिला विश्वचषक खेळला होता. त्या विश्वचषकात युवराजने इंग्लंडविरुद्ध सलग सहा षटकार ठोकण्याची किमय केलेली. दुसरीकडे, रोहित आतापर्यंत आपला आठवा विश्वचषक खेळत आहे. सध्या रोहितकडे संघाचे नेतृत्व असून, भारतीय संघाला विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फक्त हे काम केल्याने ऑस्ट्रेलियात नेहमी यशस्वी होतो विराट; आकडेवारीही झकास
INDvSA: सामन्याआधी आफ्रिकी खेळाडूची विराटला वॉर्निंग! म्हणाला, ‘तो फॉर्ममध्ये आला असला तरी आमचे गोलंदाज….’