Virat Kohli – Rohit Sharma :- 29 जून 2024 रोजी इतिहास घडला आणि रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली तब्बल 17 वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघाने टी20 विश्वचषक जिंकला. संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहात भारताने दुसऱ्यांदा टी20 विश्वचषक पटकावला. मात्र या विश्वचषकासह भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची टी20 कारकिर्दही संपुष्टात आली. या दोन्ही फलंदाजांनी क्रिकेटच्या सर्वात लहान स्वरुपातून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे आगामी 2026 टी20 विश्वचषकात रोहित-विराटची जागा कोण घेईल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आता माजी भारतीय यष्टीरक्षक दिनेश कार्तिक याने रोहित-विराटचे दावेदार कोण असतील?, याबद्दल भाकीत केले आहे.
हिटमॅन रोहित शर्मा हा टी20 क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये गणला जातो. रोहितच्या नावावर टी20 क्रिकेटमध्ये जगात सर्वाधिक धावा करणाच्या विक्रम आहे. तर रनमशीन म्हणून ओळखला जाणाऱ्या विराट कोहलीच्या नावावर विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. त्यामुळे आगामी टी20 विश्वचषकात भारतीय संघाला या सलामी जोडीची उणीव नक्कीच भासेल.
रोहित आणि विराटच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाने दोन वर्षांनंतर होणाऱ्या टी20 विश्वचषकाच्या तयारीला सुरुवात केली आहे. टी20 विश्वचषक 2024 मध्ये भारत आणि श्रीलंकेत होणार आहे. विश्वचषक सुरु व्हायला अजून बराच वेळ असला तरी तयारीला आतापासूनच सुरुवात झाली आहे. मात्र, कोहली आणि रोहितच्या निवृत्तीनंतर आता त्या दोघांच्या जागी 2026 च्या विश्वचषकामध्ये कोण खेळणार असा सवाल उपस्थित होत आहे.
यादरम्यान टीम इंडियाचा माजी यष्टिरक्षक क्रिकेटर दिनेश कार्तिकने कोहली आणि रोहितच्या जागी चार नावे सुचवली आहेत. क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीतल दिनेश कार्तिकला विचारण्यात आले की पुढील टी20 विश्वचषकात रोहित शर्मा आणि विराटचा पर्याय कोण असेल? यावर तो म्हणाला की, “सर्वप्रथम, रोहित आणि कोहली यांची जागा घेणं खूप कठीण आहे, पण मला वाटतं की सध्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चार पर्याय आहेत. ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, टिलक वर्मा आणि शुभमन गिल. मला वाटते यशस्वी जयस्वाल टी20 मध्ये सलामीला उतरेल.”
महत्त्वाच्या बातम्या –
सर्वांच्या नजरा सूर्यकुमार यादववर! कर्णधार बनवण्यासाठी प्रयत्न करतील या 3 आयपीएल फ्रँचायजी
एकच मन किती वेळा जिंकशील स्मृती! भारतीय सलामीवीर मंधानाचं जगभरात होतंय कौतुक
“मी यापेक्षा अधिक काय करू”, मोहम्मद शमीचा टीम मॅनेजमेंटला सवाल; विश्वचषकात मिळाली नव्हती संधी