भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरचा सामना रविवारी (25 सप्टेंबर) हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पहिल्या दोन सामन्यानंतर मालिका 1-1 अशा बरोबरीत असून हा तिसरा सामना निर्णायक ठरेल. हा सामना जिंकून भारतीय संघाला मालिका आपल्या नावे करण्याची संधी असेल. त्याचबरोबर भारतीय कर्णधार रोहित शर्मा हा देखील आपल्या नेतृत्वातील एक मैलाचा दगड पार करेल.
विश्वचषकाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या मालिकेतील पहिला सामना आपल्या नावे केला होता. त्यानंतर नागपूर येथील पावसामुळे आठ षटकांच्या करण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवत मालिका बरोबरीवर आणली होती. हैदराबाद येथील निर्णायक सामन्यात विजय मिळवण्याचे उद्दिष्ट दोन्ही संघांचे असेल.
हा सामना भारतीय संघाने जिंकल्यास भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या नावे एक मोठा विक्रम जमा होईल. रोहितने मागील वर्षी विश्वचषकानंतर पूर्ण वेळ भारताचा कर्णधार झाल्यापासून नऊ द्विपक्षीय मालिकांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. या मालिकेपूर्वीच्या आठही मालिका भारतीय संघाने आपल्या नावे केल्या आहेत. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धही मालिका जिंकून तो सलग नऊ द्विपक्षीय मालिका जिंकणारा कर्णधार होऊ शकतो. रोहितला 2021 टी20 विश्वचषकानंतर भारताच्या संघाचा नियमित कर्णधार बनवण्यात आले होते. तो सध्या भारताचा दुसरा सर्वात यशस्वी टी20 कर्णधार आहे.
हैदराबाद टी20 साठी संभाव्य भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कुलदीपच्या जाळ्यात अडकला न्यूझीलंड संघ, फिरकी गोलंदाजासमोर फलंदाजांचे लोटांगण
कॅप्टन अजिंक्य रहाणेचा संघ बनला चॅम्पियन! ठरली दुलीप ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात ‘यशस्वी’ टीम
तिसऱ्या टी20साठी रिषभ पंतचा पत्ता कट? जाणून घ्या कारण आणि भारताची संभावित प्लेईंग 11