इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १४ व्या हंगामातील दुसऱ्या टप्प्यासाठी सर्व संघ तयारीला लागले आहेत. चेन्नई सुपर किंग आणि मुंबई इंडियन्सचा संघ यूएईला पोहोचला आहे. तिथे त्यांचा सराव देखील चालू झाला आहे. आता हळूहळू आयपीएलचे उर्वरित संघ देखील लवकरच यूएईला रवाना होतील.
यासंदर्भात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या (आरसीबी) ताफ्यातून एक बातमी समोर आली. आरसीबीचा संघ देखील लवकरच यूएईला उड्डाण भरणार आहे. यासंदर्भात आरसीबीचे भारतीय खेळाडू सपोर्ट आणि इतर व्यवस्थापक हे २१ ऑगस्ट पर्यंत बेंगलोर येथे येण्याची शक्यता आहे. तिथून त्यांना ७ दिवसांसाठी विलीनीकरणाच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. व या दरम्यान त्यांची कोविडची चाचणी देखील करण्यात येणार आहे.
त्यानंतर आरसीबीचा संघ २९ ऑगस्टला यूएईला रवाना होऊ शकतो. तिथे गेल्यावरही खेळाडूंना आयपीएलच्या कोविडबाबतच्या नियमानुसार विलीनीकरणाच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. त्यानंतरच आरसीबीच्या खेळाडूंनामध्ये सराव करता येणार आहे.
दरम्यान, आरसीबी क्रिकेटचे संचालक माइक हेसन यांनी आरसीबी संघातील बदलांबाबत बोलताना सांगितले, “आम्ही यूएईमध्ये होणाऱ्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी संघात काही बदल केले आहे. सध्या आमचा संघ मजबूत स्थितीत आहे. त्याचबरोबर आम्ही वनिंदू हसरंगा, टीम डेविड आणि दुशमंथा चमिरा, यांना दुसऱ्या टप्प्यासाठी संघात सामील केले आहे. जशी आमची पहिल्या टप्प्यात कामगिरी होती, तसेच दुसऱ्या टप्प्यातही ठेवण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न असेल.”
“दरवेळीप्रमाणे यंदाच्याही हंगामात आरसीबीने पहिल्या टप्प्यात उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. ज्यामुळे आरसीबी सध्या चांगल्या स्थितीत आहे. यालाच कायम करत कर्णधार विराट कोहली आणि आरसीबीने आपला आयपीएलचा पहिला किताब जिंकण्यावर लक्ष केंद्रित केले आहे,” असेही ते म्हणाले.
आरसीबीचा दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना २० सप्टेंबरला अबुधाबीच्या शेख जायद क्रिकेट स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) विरुद्ध होणार आहे. आरसीबीने आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात चांगली सुरुवात करत ७ सामन्यांपैकी ५ सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे १० गुणांसह आरसीबीचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. महत्त्वाचे म्हणजे आरसीबीचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल हा यंदाच्या स्पर्धेतील सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्यामुळे आरसीबीची कमजोर बाजू असलेला गोलंदाजी विभाग देखील यंदा मजबुत स्थितीत आहे.
दरम्यान, १९ सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी संघांनी तयारी चालू केली आहे.
महत्वाच्या बातम्या –
–नव्या भूमिकेसाठी इरफान सज्ज; ‘तो’ अभ्यासक्रम पूर्ण करताच आयपीएलमध्ये प्रशिक्षक बनण्याची इच्छा व्यक्त
–‘लॉर्ड्समध्ये शतक बनवणेच सर्वकाही नाही, त्याची ८३ धावांची खेळीही उत्तमच’, महान भारतीय क्रिकेटरकडून कौतुक
–चोरी प्रकरणात बीसीसीआयने हस्तक्षेप करण्याची रसूलची मागणी, म्हणाला…