सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. ही मालिका भारतीय संघाने यापूर्वीच आपल्या नावे केलीये. त्यानंतर उभय संघांमध्ये तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली जाईल. मात्र, या मालिकेआधीच भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे. भारताचा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड संभाव्य दुखापतीमुळे थेट बेंगलोरस्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) येथे दाखल झाला असल्याचे वृत्त समोर येत आहे.
उभय संघातील ही टी20 मालिक 27 जानेवारीपासून सुरू होईल. या मालिकेसाठी नियमित कर्णधार रोहित शर्मा व अनुभवी फलंदाज विराट कोहली यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे या संघात बरेच युवा खेळाडू दिसून येतील. या संघाचे नेतृत्व अष्टपैलू हार्दिक पंड्या हा करेल.
टी20 मालिकेसाठी निवड झालेला युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड हा सध्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळत आहे. हैदराबादविरुद्धच्या सामन्यानंतर मात्र त्याने आपल्या मनगटातला दुखापत झाली असल्याची शंका व्यक्त केली. सामन्या दरम्यानच त्याला हा त्रास होत असल्याचे त्याने स्पष्ट केले होते. तरीदेखील त्याने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला. तो या सामन्यात अनुक्रमे 8 व 0 धावा करू शकला.
हैदराबाद विरुद्धच्या सामन्यानंतर त्याने थेट बेंगलोर येथे एनसीएमध्ये प्रवेश घेतला. तेथे त्याची तपासणी करून तो टी20 मालिकेसाठी तंदुरुस्त आहे का हे लवकरच स्पष्ट करण्यात येईल. त्याच्याआधी संघाचा मधल्या फळीतील अनुभवी फलंदाज श्रेयस अय्यर हा देखील सध्या एनसीएमध्ये पुनर्वसन करत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिके वेळी तोदेखील दुखापतग्रस्त झाल्याने न्यूझीलंडविरुद्धच्या दोन्ही मालिकांमधून बाहेर पडलेला. ऋतुराज या मालिकेसाठी उपलब्ध नसल्यास पृथ्वी शॉ याला पुनरागमन करण्याची संधी मिळू शकते.
(Ruturaj Gaikwad Checked Into NCA After Suspected Wrist Injury Ahead T20 Series Against Newzealand)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता सुट्टी नाही! द्विशतकानंतर शतक ठोकताच ‘या’ विक्रमात बाबर आझमच्या मांडीला मांडी लावून बसला गिल
टीम इंडिया फोडणारच! नव्या वर्षातील ही तुफानी आकडेवारी समोर, तीन प्रतिस्पर्धी नामोहरम