---Advertisement---

जयस्वाल-गिल नव्हे, ‘या’ भारतीय फलंदाजाला घाबरतात इंग्लंडचे गोलंदाज! माजी क्रिकेटरचा मोठा खुलासा

On: सोमवार, जुलै 21, 2025 10:17 AM
Yashasvi Jaiswal and Shubman Gill
---Advertisement---

Sanjay Manjrekar Statement On Rishabh Pant: भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी अशा भारतीय फलंदाजाबद्दल सांगितले आहे, ज्याच्या फलंदाजीला इंग्लंडचे गोलंदाज घाबरतात. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना भारतीय माजी क्रिकेटपटू म्हणाले की, भारतीय संघात रिषभ पंत हा एक असा फलंदाज आहे, ज्याच्या फलंदाजीला इंग्लंडचे गोलंदाज घाबरतात. मांजरेकर म्हणाले, “रिषभ पंत कोणत्याही परिस्थितीत आपल्या पद्धतीने खेळेल, त्याला हे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, कारण तो त्यासाठी पात्र आहे.” (Sanjay Manjrekar On Rishabh Pant)

मांजरेकर पुढे म्हणाले, “फलंदाजीत भारताला चांगली कामगिरी करावी लागेल. जयस्वालने तो कसा बाद झाला, याचा थोडा विचार केला पाहिजे. त्याने आपल्या फॉर्मचा फायदा घेतला पाहिजे. मला वाटते की पंत पाचव्या क्रमांकावर एक मोठा खेळाडू आहे. तो एक असा फलंदाज आहे, ज्याला इंग्लंड संघ घाबरतो.” पंतने आतापर्यंत 6 डावांमध्ये फलंदाजी करताना मालिकेत एकूण 425 धावा केल्या आहेत. त्याने 70.83च्या सरासरीने धावा करण्यात यश मिळवले आहे. आतापर्यंत पंतने मालिकेत 2 शतके झळकावली आहेत. (Rishabh Pant’s performance in the India-England series)

लॉर्ड्स कसोटी सामन्यात पंतच्या हाताला दुखापत झाली होती, त्यामुळे तो यष्टीरक्षण करू शकला नाही. अशा परिस्थितीत आता चौथ्या कसोटीत यष्टीरक्षक म्हणून त्याचे खेळणे कठीण दिसत आहे. परंतु फलंदाज म्हणून पंत चौथ्या कसोटीचा भाग असेल, यात कोणतीही शंका नाही. संघाच्या प्लेइंग इलेव्हनबाबत अंतिम निर्णय सामन्याच्या दिवशी होण्याची शक्यता आहे. (Team India Playing XI)

लॉर्ड्स कसोटी सामना जिंकून इंग्लंड संघाने मालिकेत पुन्हा एकदा आघाडी घेतली आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघासाठी चौथा कसोटी सामना जिंकणे अत्यंत आवश्यक आहे. जर हा सामना अनिर्णित राहिला, तर भारताला मालिका जिंकता येणार नाही. भारतीय संघाला मालिका जिंकण्यासाठी मालिकेतील उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. (India England Test Series)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---