आयपीएल 2023 मध्ये राजस्थान रॉयल्स सध्या सर्वोत्तम संघ दिसून येत आहे. राजस्थानने मागील आठवडाभरापासून गुणतालिकेतील आपले अग्रस्थान कायम राखलेय. राजस्थानच्या या यशामध्ये कर्णधार संजू सॅमसन याचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. संजू मागील तीन वर्षापासून राजस्थानचा कर्णधार असून, संघाने सातत्यपूर्ण कामगिरी केली. त्याचवेळी संजूने एका प्रसारण वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपण राजस्थान रॉयल्स संघाचा भाग कसा झालो याबाबत खुलासा केला.
आयपीएलचे प्रसारण करणाऱ्या वाहिनीची मुलाखत देताना संजूने जुन्या आठवणींना उजाळा दिला. तो म्हणाला,
“मला राजस्थान रॉयल्समध्ये आणण्यात सर्वात मोठा वाटा श्रीसंत याचा राहिला. त्यानेच 2013 मध्ये राहुल सरांशी बोलून मला ट्रायलसाठी आमंत्रित केले. त्यावेळी राहुल सर संघाचे कर्णधार होते. दोन दिवस झालेल्या ट्रायल्समध्ये मी राहुल सर व पॅडी अप्टन यांच्यासमोर माझा खेळ दाखवला. मला वाटते की मी त्यावेळी आयुष्यातील सर्वोत्तम फलंदाजी केली होती. ते दोघेही माझ्या खेळाने खुश झाले. राहुल सर मला स्वतः म्हणाले, राजस्थानसाठी खेळणार का? इतक्या मोठ्या क्रिकेटपटूकडून असा प्रतिसाद येणे अनपेक्षित होते. त्यानंतर हा प्रवास सुरू झाला.”
संजूने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात 2012 मध्ये कोलकाता नाईट रायडर्ससह केली होती. मात्र, त्यावेळी त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर तो राजस्थान रॉयल्समध्ये दाखल झाला. सलग तीन वर्ष त्याने राजस्थानसाठी सातत्यपूर्ण कामगिरी केली. राजस्थान रॉयल्स निलंबित झाल्यानंतर पुढील दोन वर्ष तो दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा भाग होता. 2018 मध्ये राजस्थानच्या पुनरागमनापासून तो पुन्हा रॉयल्ससाठीच खेळू लागला. 2021 मध्ये त्याच्याकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले. 2022 मध्ये राजस्थान नेत्याच्या नेतृत्वात अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. चालू हंगामात देखील राजस्थान उत्कृष्ट कामगिरी करत असून त्यांना विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे.
(Sanju Samson Tell His Story Of Playing For Rajasthan Royals Talk About Dravid Upton And Sreesanth)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तो हिरा आहे, जो नेहमी जुन्या मित्रांना…’, भज्जीने तोंडभरून केलं रोहितचं कौतुक, तुम्हीही वाचाच
दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंच्या साहित्याचा लागला शोध, लाखोंच्या बॅट गेलेल्या चोरीला, दिल्ली पोलिसांनी 48 तासात लावला छडा