---Advertisement---

SAvsIND, 1st Test: भारताने रचला इतिहास, दक्षिण आफ्रिकेवर तब्बल ११३ धावांनी मिळवला दणदणीत विजय

Team India
---Advertisement---

सेंच्यूरियन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) संघात रविवारपासून (२६ डिसेंबर) सुपरस्पोर्ट पार्क (SuperSport Park) येथे तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरु होता. बॉक्सिंग डे कसोटी असलेल्या या सामन्याचा गुरुवारी अखेरचा दिवस होता. अखेरच्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची दाणादण उडवत ११३ धावांची दणदणीत विजय मिळवला आहे. यासह त्यांनी कसोटी मालिकेत १-० अशी आघाडीही घेतली आहे.

या विजयासह पाहुण्या भारतीय संघाने इतिहास रचला आहे. सेंच्यूरियनमध्ये कसोटी सामना जिंकणारा भारत केवळ तिसराच संघ बसला आहे. यापूर्वी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाने हा पराक्रम केला आहे.

गुरुवारी दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात ४०.५ षटकांपासून आणि ४ बाद ९४ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली होती. दक्षिण आफ्रिकेकडून चौथ्या दिवसाखेर नाबाद राहिलेले तेंबा बाऊमा आणि डीन एल्गार या जोडीने अखेरच्या दिवशी अनुक्रमे ० आणि ५२ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली होती. परंतु कर्णधार एल्गारला ७७ धावांवर पायचित करत बुमराहने संघाला मोठे यश मिळवून दिले. त्यानंतर क्विंटन डी कॉक, वियान मल्डर स्वस्तात माघारी परतले.

पुढे लंच ब्रेकनंतर भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या तळातील फलंदाजांना धडाधड पव्हेलियनचा रस्ता दाखवला. परिणामी ६८ षटकांमध्ये १९१ धावांवर दक्षिण आफ्रिकेचा संघ सर्वबाद झाला आणि भारताने दक्षिण आफ्रिकेवर ऐतिहासिक विजय मिळवला.

भारताकडून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराज आणि आर अश्विनने २ विकेट्सचे योगदान दिले.

https://twitter.com/BCCI/status/1476506120067813376?s=20

दक्षिण आफ्रिकेला मिळाली होती चांगली सुरुवात

गुरुवारी दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात ४०.५ षटकांपासून आणि ४ बाद ९४ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली होती. दक्षिण आफ्रिकेकडून चौथ्या दिवसाखेर नाबाद राहिलेले तेंबा बाऊमा आणि डीन एल्गार या जोडीने अखेरच्या दिवशी अनुक्रमे ० आणि ५२ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली होती. त्यांनी दिवसाच्या सुरुवातीला चांगला खेळ करत दक्षिण आफ्रिकेला १०० धावांच्या पार नेले.

https://twitter.com/ICC/status/1476461921704443905

एल्गार आणि बाऊमाने चांगला खेळ केला होता, त्यामुळे त्यांची जोडी जमली असे वाटले होते. मात्र, असं असतानाच एल्गारला जसप्रीत बुमराहने ७७ धावांवर बाद करत भारताला दिवसातील पहिले यश मिळवून दिले. एल्गारने १५६ चेंडूत ही खेळी करताना १२ चौकार मारले. तो बाद झाल्यानंतर तेंबा बाऊमाला क्विंटन डी कॉकने चांगली साथ दिली. मात्र, तोही फार काळ टिकू शकला नाही. डी कॉकला मोहम्मद सिराजने ६० व्या षटकात त्रिफळाचीत केले. डी कॉकने २१ धावा केल्या. त्याच्यानंतर लगेचच वियान मल्डर १ धावेवर मोहम्मद शमीविरुद्ध खेळताना यष्टीरक्षक रिषभ पंतला झेल देऊन १ धावेवर बाद झाला.

यानंतर मात्र, बाऊमाला मार्को जेन्सनने चांगली साथ देताना पहिल्या सत्रात आणखी पडझड होऊ दिली नाही. पहिल्या सत्राखेर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात ६६ षटकात ७ बाद १८२ धावा केल्या. बाऊमा ३४ धावांवर आणि जेन्सन ५ धावांवर नाबाद आहे. अजून दक्षिण आफ्रिकेला १२३ धावांची आणि भारताला ३ विकेट्सची गरज आहे.

https://twitter.com/BCCI/status/1476495373074001921

या सामन्यात भारताने पहिल्या डावात सर्वबाद ३२७ धावा केल्या होत्या, तर दक्षिण आफ्रिकेला १९७ धावांवर सर्वबाद केले होते. यासह भारताने पहिल्या डावात १३० धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर भारताचा दुसरा डाव १७४ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे भारताने ३०५ धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवले.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---