---Advertisement---

अखेर बीसीसीआयला आली जाग, सुरू केला हार्दिकच्या पर्यायी खेळाडूचा शोध; ‘या’ अष्टपैलूंवर नजर

On: गुरूवार, नोव्हेंबर 4, 2021 3:15 PM
---Advertisement---

टी२० विश्वचषकात सलग दोन पराभव पत्करल्यानंतर भारतीय संघाने बुधवारी (३ नोव्हेंबर) अफगाणिस्तानला नमवले. गेल्या दोन सामन्यात खराब प्रदर्शन करणाऱ्या हार्दिक पांड्याने या सामन्यात इतर फलंदाजांसोबत चांगला खेळ दाखवला. पण सध्याच्या टी२० विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाला वेगवान गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूची उणीव भासत आहे. संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आता पूर्वीसारखा राहिलेला नाही. दुखापतीतून पुनरागमन केलेल्या हार्दिकला आता गोलंदाजी करताना त्रास होत आहे. याबरोबरच फलंदाजीतही त्याला वेगवान धावा करता येत नाहीत. यामुळेच यावेळी भारतीय संघ कमकुवत दिसत आहे.

हार्दिकच्या या त्रासामुळे भारतीय संघाला खालच्या फळीत फिनिशर आणि गोलंदाजीत सहावा गोलंदाज मिळाला नाही. म्हणून बीसीसीआयने आता एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

हार्दिकच्या दुखापतीतून आणि त्याच्या कामगिरीतून कठोर धडे घेतल्यानंतर, राष्ट्रीय निवडकर्त्यांनी आता त्याच्या पर्यायावर म्हणजेच वेगवान गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारपासून (४ नोव्हेंबर) सुरू होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली टी-२० चषकादरम्यान पाच सदस्यीय पॅनेल वेगवान गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूंवर बारीक नजर ठेवेल. इंडियन प्रीमियर लीग लिलावादरम्यान देखील, फ्रँचायझी वेगवान गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलूंवर मोठ्या प्रमाणात पैसे देऊ शकतात.

हार्दिक आता पूर्वीसारखा अष्टपैलू खेळाडू राहिलेला नाही, कारण त्याच्या पाठदुखीने त्याला सतावले आहे. सध्याच्या टी-२० विश्वचषकात हार्दिकच्या गोलंदाजीची बरीच चर्चा झाली आहे. त्याची भारतीय संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड झाली होती, परंतु त्याने पाकिस्तानविरुद्ध गोलंदाजी केली नाही आणि न्यूझीलंडविरुद्ध फक्त दोन षटके टाकली ज्यात त्याने १७ धावा दिल्या. याआधी त्याने आयपीएलमध्ये गोलंदाजी केली नव्हती. हेच कारण आहे की निवडकर्ते आता फक्त हार्दिकवर अवलंबून राहू इच्छित नाहीत आणि संभाव्य पर्याय शोधू इच्छित आहेत.

म्हणून, मुश्ताक अली करंडक स्पर्धा विजय शंकर (तामिळनाडू), शिवम दुबे (मुंबई) आणि व्यंकटेश अय्यर (मध्य प्रदेश) यांना निवडकर्त्यांना प्रभावित करण्यासाठी एक चांगले व्यासपीठ प्रदान करेल. सौराष्ट्रातील ३१ वर्षीय चिराग जानी देखील चांगला पर्याय असू शकतो. त्याच्या कामगिरीवरही निवड समितीचे लक्ष असेल.

ही निवड समिती राष्ट्रीय टी२० स्पर्धेत फिरकी गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूंच्या कामगिरीवरही लक्ष ठेवेल. कारण सध्या राष्ट्रीय संघात अव्वल पाच फलंदाज आहेत. त्यामुळे निवडकर्त्यांचे लक्ष कृणाल पांड्याच्या कामगिरीवर राहील. अशा परिस्थितीत पृथ्वी शॉ ऑफ स्पिन गोलंदाजी करताना दिसला, तर कुणालाही आश्चर्य वाटायला नको.

याशिवाय सर्व खेळाडू पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएल लिलावात चांगली कामगिरी करून आपला दावा मजबूत करण्याचा प्रयत्न करतील. महाराष्ट्राचा अतिशय प्रतिभावान कर्णधार रुतुराज गायकवाड, कर्नाटकचा देवदत्त पडिक्कल आणि रविकुमार समर्थ आणि तामिळनाडूचा एन जगदीसन, सी हरी निशांत मोठी धावसंख्या करण्याचा प्रयत्न करतील. एवढेच नाही तर ऋद्धिमान साहा आणि अजिंक्य रहाणेसारखे वरिष्ठ खेळाडूही आपली दावेदारी मजबूत करण्यासाठी कटिबद्ध असतील.

या स्पर्धेत यावेळी, पाच एलिट गट आणि एक प्लेट गट अशी विभागणी करण्यात आली आहे. कोविड-१९ महामारीमुळे ही स्पर्धा सलग दुसऱ्या वर्षी बायो-बबलमध्ये खेळवली जाणार आहे. बाद फेरीचे सामने दिल्लीत होणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

जडेजाचा जबरदस्त झेल पाहून सामना दर्शकांनी घातली तोंडात बोटे, पण अखेर प्रयत्न ठरले विफळ!

तू खिंच मेरी फोटो! चौकार मारल्यानंतर स्कॉटिश फलंदाजाची ऍक्शन पाहून बोल्टने काढला फोटो -Video

“एक,दोन, तीन…”, लाईव्ह पत्रकार परिषदेत रोहितने केले असे काही, व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---