India vs England Test Series: भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. जिथे भारताचा इंग्लंडविरूद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. भारत-इंग्लंड संघातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना उद्या, 20 जूनपासून लीड्समध्ये सुरू होणार आहे. दोन्ही संघ यासाठी सज्ज आहेत. इंग्लंडने तर आपल्या प्लेइंग इलेव्हनचीही घोषणा केली आहे. दरम्यान, तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच असेल की, भारतात सामना किती वाजता सुरू होईल आणि किती वाजेपर्यंत चालेल. तसेच, मध्ये जे ब्रेक असतील, त्यांना किती वेळ लागेल. चला तर मग या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊयात.
भारत विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता (3:30 PM IST) सुरू होईल. त्यापूर्वी अर्धा तास म्हणजे 3 वाजता (3:00 PM IST) टॉस होईल. मात्र, टॉस फक्त पहिल्याच दिवशी होईल. त्यानंतर 4 दिवस थेट साडेतीन वाजता सामना सुरू होईल. आता पहिला सेशन किती वाजेपर्यंत चालेल हे देखील जाणून घ्या. साडेतीन वाजता सुरू होऊन पहिले सेशन साडेपाच वाजेपर्यंत (5:30 PM IST) चालेल, जे 2 तासांचे असेल. यानंतर लंच ब्रेक होईल. (Test Match Session Times)
यानंतर, संध्याकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी (6:10 PM IST) पुन्हा सामना सुरू होईल, जो रात्री सुमारे 8 वाजून 10 मिनिटांपर्यंत (8:10 PM IST) चालेल. 8 वाजून 10 मिनिटांपासून ते 8 वाजून 30 मिनिटांपर्यंत ब्रेक असेल, हा टी-ब्रेक आहे. यानंतर साडेआठ वाजता (8:30 PM IST) शेवटचे सेशन सुरू होईल, जे रात्री सुमारे साडेदहा वाजेपर्यंत (10:30 PM IST) चालेल. मात्र, यावेळी हे नक्कीच लक्षात ठेवले जाईल की, पावसामुळे सामन्यात कोणताही व्यत्यय आला नसेल तर पूर्ण 90 षटकांचा खेळ होईल. (IND vs ENG Match Timings)
इंग्लंडमध्ये सामना कुठेही असो, पण हवामान असेच राहते. कधी पाऊस येईल आणि कधी थांबेल, काही सांगता येत नाही. पण, सध्या पहिल्याच सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, त्यात पावसामुळे जास्त व्यत्यय येण्याची शक्यता नाही, परंतु हवामान कधी बदलेल, हे सांगणे कठीण आहे. तरीही, असे मानले जाऊ शकते की, थोडावेळ जरी सामना थांबला तरी, सामन्यावर याचा फारसा परिणाम होणार नाही.





