---Advertisement---

उमेश, इशांतने केला मोठा खूलासा, कसोटीत यश मिळण्यामागचे हे आहे गुपित…

---Advertisement---

भारत विरुद्ध बांगलादेश संघात इडन गार्डन, कोलकाता येथे झालेला दिवस-रात्र कसोटी सामना रविवारी संपला. या सामन्यात भारताने 1 डाव 46 धावांनी विजय मिळवला. त्याचबरोबर 2 सामन्यांची कसोटी मालिकाही 2-0 अशा फरकाने जिंकली.

भारताच्या या विजयात उमेश यादव आणि इशांत शर्माने महत्त्वाचा वाटा उचलला. या दोघांनी मिळून दिवस-रात्र कसोटी सामन्यात 17 विकेट्स घेतल्या. या शानदार कामगिरीनंतर उमेश आणि इशांतने बीसीसीआयच्या एका मुलाखतीत त्यांच्या यशाचे गुपीत सांगितले आहे. ही मुलाखत भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने घेतली.

यावेळी उमेशने सांगितले की ‘मी बॉल पकडण्याचा पद्धतीत बदल केला, ज्याने मला खूप मदत झाली. सुरुवातीला माझी वेगळी पकड होती, एक-दोन चेंडू स्विंग करायचे, तर काही चेंडू पायाच्या जवळून जायचे किंवा लेग साईडने जाऊन बाऊंड्री लाईन पार करायचे. त्यामुळे पकड नियंत्रित करणे अवघड होते.’

‘म्हणून मी माझ्या प्रशिक्षकांशी बोललो आणि चर्चा केली. त्यानंतर मला वाटले की जेव्हा मी चेंडू व्यवस्थित धरतो तेव्हा माझ्याकडे अधिक नियंत्रण असते आणि चेंडूत विविधता येण्याची शक्यता असते. त्यामुळे माझा आउटस्विंगर सुसंगत झाला आणि बदल केल्यावर मी काही इनस्विन्गर्स चेंडूही टाकू शकलो.’

तसेच दिवस-रात्र कसोटीत सामनावीर ठरलेला इशांत म्हणाला, ‘मी माझ्या मनगटाच्या स्थितीनुसार माझ्या गोलंदाजीत कोन(angles) तयार केले. ज्यामुळे डावकरी फलंदाजांना माझ्याविरुद्ध खेळणे कठिण गेले.’

‘यापूर्वी माझ्या चेंडूला फलंदाजाच्या बॅटची कड लागत नव्हती. चेंडू ऑफ स्टम्पच्या इथे टप्पा पडून बाहेर जात होते. पण आता मी जेव्हा स्टम्पच्या समोर गोलंदाजी करतो तेव्हा फलंदाजांना ते चेंडू खेळणे कठिण जाते.’

या दिवस-रात्र कसोटीत उमेशने पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 5 असे 8 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच इशांतने पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 4 असे 9 विकेट्स घेतल्या.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---