दक्षिण आफ्रिका आणि भारत (SAvIND) यांच्यातील दुसरा कसोटी सामन्याला सोमवारपासून (३ जानेवारी) जोहान्सबर्ग येथे सुरुवात झाली आहे. भारतीय संघ आपल्या पहिल्या डावात २०२ धावांवर सर्वबाद झाला. मात्र, दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत सामन्यात पुनरागमन केले. भारतीय संघाचा अष्टपैलू शार्दुल ठाकूर याने पाच बळी मिळवत या पुनरागमनात महत्त्वाची भूमिका बजावली. हे त्याच्यासाठी कारकिर्दीतील पहिले पंचक आहेत. त्याचवेळी त्याने या कामगिरीसह अनेक दिग्गजांच्या यादीत आपले नाव समाविष्ट केले.
शार्दुल ठाकूरने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात डीन एल्गर, किगन पीटरसन व रॅसी वॅन डर डुसेन यांना तंबूचा रस्ता दाखवत भारताला सामन्यात पुनरागमन करून दिले. त्यानंतर दुसऱ्या सत्रात टेंबा बवूमा व कायले वेराना यांची भागीदारी बनत असताना, दोघांना लागोपाठच्या षटकात बाद करत त्याने आघाडीच्या दिशेने चाललेल्या दक्षिण आफ्रिका संघाला रोखले. त्याचबरोबर त्याने कसोटी कारकिर्दीत प्रथमच पाच बळी आपल्या नावावर केले. त्यानंतर त्याने दक्षिण आफ्रिकेचे अखेरचे दोन गडी करत ६१ धावा देऊन ७ बळी आपल्या नावे केले. ही कोणत्याही भारतीय गोलंदाजाची दक्षिण आफ्रिकेतील सर्वोत्तम कामगिरी आहे.
या पाच बळींसह तो जोहान्सबर्ग येथील वॉन्डरर्स स्टेडियमवर बळींचे पंचक घेणारा सहावा भारतीय बनला. या मैदानावर अशी कामगिरी सर्वप्रथम अनिल कुंबळे यांनी १९९२-१९९३ मध्ये ५३ धावा देत ६ बळी मिळवले होते. त्यानंतर, १९९६-१९९७ च्या दौऱ्यावर जवागल श्रीनाथ यांनी पाच बळी मिळवलेले. तर, २००६ मध्ये भारतीय संघाने या मैदानावर मिळवलेल्या विजयात श्रीसंतने पाच बळी घेत महत्त्वाचे योगदान दिले होते. त्यानंतर २०१८ दौऱ्यावेळी जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमीने ही कामगिरी करून दाखवलेली.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एका डावात ७ बळी मिळवणारा तो तिसरा गोलंदाज बनला. हरभजन सिंग याने ही कामगिरी केली होती. रविचंद्रन अश्विन एकदा सात बळी मिळवले होते. मात्र, शार्दुल या दोघांना मागे टाकत सर्वात किफायतशीर गोलंदाजी करत या यादीमध्ये पहिल्या स्थानी पोहोचला.
महत्त्वाच्या बातम्या-