गेल्या ४ महिन्यात भारतीय क्रिकेटमध्ये अनेक बदल पाहायला मिळाले. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) तिन्ही क्रिकेट प्रकारातील संघांच्या नेतृत्त्वपदावरून पायउतार झाला आहे. त्याने दक्षिण नोव्हेंबर २०२० मध्ये टी२० संघाचे कर्णधारपद सोडले, तर डिसेंबर २०२० मध्ये त्याच्याकडून वनडे कर्णधारपद काढून घेण्यात आले. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील कसोटी मालिकेनंतर विराटने जानेवारी २०२१ मध्ये कसोटी कर्णधारपदही सोडले. त्याचे कसोटी कर्णधारपदावरून पायउतार होणे, सर्वांसाठीच धक्कादायक होते. आता याबद्दल शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डिसेंबर-जानेवारी दरम्यान झालेल्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला २-१ अशा फरकाने पराभवाला सामने जावे लागले होते. त्यानंतर विराटने आचानक कसोटी कर्णधारपद (Test Captaincy) सोडण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाबद्दल बोलताना शार्दुलने सांगितले की, त्याच्यासाठी ही धक्का देणारी बातमी होती. शार्दुल देखील दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघाचा भाग होता.
शार्दुलने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितेल की, ‘तो (विराटने कसोटी कर्णधापद सोडणे) सर्वांसाठीच भावनिक क्षण होता. कोणालाही अपेक्षित नव्हते की तो कसोटी कर्णधारपद सोडेल. आम्ही त्याच्या नेतृत्त्वाखाली चांगली कामगिरी केली होती. विशेषत: परदेशात. आम्ही परदेशात ज्या मालिका गमावल्या, त्यात आम्ही खूप कमी फरकाने हरलो. त्याच्या नेतृत्त्वाखाली संघ चांगले प्रदर्शन करत होता. तरी, आता त्याने त्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे सर्वांनी त्याच्या निर्णयाचा सन्मान करायला हवा.’
विराटनंतर भारताच्या मर्यादीत षटकांच्या संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्यात आले आहे. पण, अद्याप नव्या कसोटी कर्णधाराची घोषणा करण्यात आलेली नाही. कसोटी कर्णधारपदासाठी रोहित शर्मा, केएल राहुल, रिषभ पंत आणि जसप्रीत बुमराह हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
अधिक वाचा – ‘या’ शहरात विराट झळकावणार ‘शतक’, श्रीलंकेविरुद्धच्या दिवस-रात्र कसोटीसंदर्भात गांगुलीकडून अपडेट
विराटची कसोटी कर्णधार म्हणून कामगिरी
विराटने आत्तापर्यंत ६८ कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्त्व केले होते. त्याने यातील ४० सामन्यात विजय मिळवला असून १७ सामन्यात पराभव स्विकारला आहे. तसेच ११ सामने त्याच्या नेतृत्त्वाखाली अनिर्णित राहिले.
विराटने या ६८ सामन्यांपैकी परदेशात ३६ सामन्यात नेतृत्त्व केले. त्याने यातील १६ सामन्यांत विजय मिळवले असून १४ सामन्यात पराभव स्विकारले आहेत. तसेच ६ सामने अनिर्णित राहिले आहेत. तो परदेशातही सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारा भारतीय कर्णधार आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणाराही पहिला भारतीय कर्णधार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मोईन अलीच्या पोराने ४१ वर्षीय आफ्रिदीला धू धू धुतला! एकाच षटकात ठोकले ३ षटकार, पाहा व्हिडिओ
संघाबाहेर होण्याच्या मार्गावर असलेल्या पुजारा अन् रहाणेला मिळाली आशेची किरण, हिट झाले तर नशीब बदलणार
पाकिस्तानी खेळाडूंचा नादखुळा! झेल तर सोडलाच नंतर एकमेकांना दिली जबर धडक – व्हिडिओ